शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Pune: डिंभे धरणात अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणलोट क्षेत्रात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:57 IST

शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे....

डिंभे (पुणे) : येथील धरणातील पाणीसाठा १,५०४ दशलक्ष घनफुटावर आला आहे. आज या धरणात अवघा ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सिंचनासाठी डाव्या कालव्याद्वारे ६०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रातील घोडनदीपात्र रिकामे झाली असून, पाणीपुरवठा योजना धोक्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. आजमितीस या धरणात केवळ ४% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील या तारखेला धरणात १४ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणातून डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी ६०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी कमी होत असून धरणाच्या आतील बाजूस आसणारे घोडनदीपात्र झपाट्याने रिकामी होत आहे. यामुळे डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी भागातील पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून धरणाच्या आतील भागातील शेतकऱ्यांनी गाळपेरीतील उन्हाळी बाजरी, फरशी, मका, जनावरांसाठी हिरवा चारा ही पिके घेतली आहेत. मात्र, धरणातील पाणीसाठा झपाट्याने खाली जात असल्यामुळे ही पिके धोक्यात आली असून, शेतकरीवर्ग अडचणी सापडला आहे.

दूषित पाणी पिण्याची वेळ आली -

नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून, यामुळे या भागात आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. एकंदरीतच डिंभे धरणातील पाणीसाठ्याने यंदा तळ गाठला असून, आजमितीस या धरणात केवळ ४ टक्के इतका निश्चयांकित पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. घोडनदी पात्र कोरडे पडल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे