शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 15:28 IST

अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात २ दिवसात २ खुनाच्या घटना घडल्याने उडाली खळबळ

मंचर : अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे. संजय शिवराम वायाळ (वय 46 रा. फकीरवाडी सुलतानपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अमर लक्ष्‍मण वायाळ, भरत जानकू वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ (सर्व रा. फकीरवाडी सुलतानपूर) व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात मंचरपोलिस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसात लागोपाठ दोन खुनांच्या घटना घडल्याने आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी संजय वायाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संजय वायाळ यांनी ग्रामपंचायत एकलहरे येथे भरत जानकू वायाळ, अमर लक्ष्‍मण वायाळ, लक्ष्‍मण जानकू वायाळ यांच्या अवैद्य बांधकामाची नोंद होऊ नये म्हणून अर्ज दिला होता. तिघांनी पती संजय यांना मारहाण केली होती. मंचर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली होती.

तिघेही संजय वायाळ यांच्या कुटुंबाशी वारंवार भांडणे करत होते. संजय वायाळ यांची वडिलोपार्जित जमीन मिळावी असा प्रयत्न त्यांचा होता. आज सकाळी संजय वायाळ हे नाष्टा करून घराबाहेर पडले. दुपारी बारा वाजता ते सुलतानपूर रस्त्यालगत गवतामध्ये जखमी अवस्थेत मिळाले. बाजूलाच त्यांची मोटरसायकल तसेच भरत जानकू वायाळ यांची चारचाकी गाडी उभी होती. संजय वायाळ यांच्या गळ्यावर, डोक्यात,हातावर गंभीर जखमा आढळून आल्या. संजय वायाळ यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावले होते. ग्रामपंचायत कार्यालय एकलहरे येथे अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकु वायाळ आणि लक्ष्मण जानकू वायाळ यांच्या अवैद्य बांधकामाची नोंद होऊ नये असा अर्ज संजय वायाळ यांनी दिला होता.

त्याचा राग मनात धरून तसेच यापूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून त्यांनी साथीदारांच्या मदतीने धारदार हत्याराने संजय वायाळ यांचा खून केल्याची फिर्याद त्यांची पत्नी माधुरी वायाळ यांनी दिली आहे. पोलिसांनी अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकू वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचा बनाव करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व अमृत देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करत आहेत.

टॅग्स :MancharमंचरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक