शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 15:28 IST

अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात २ दिवसात २ खुनाच्या घटना घडल्याने उडाली खळबळ

मंचर : अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे. संजय शिवराम वायाळ (वय 46 रा. फकीरवाडी सुलतानपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अमर लक्ष्‍मण वायाळ, भरत जानकू वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ (सर्व रा. फकीरवाडी सुलतानपूर) व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात मंचरपोलिस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसात लागोपाठ दोन खुनांच्या घटना घडल्याने आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी संजय वायाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संजय वायाळ यांनी ग्रामपंचायत एकलहरे येथे भरत जानकू वायाळ, अमर लक्ष्‍मण वायाळ, लक्ष्‍मण जानकू वायाळ यांच्या अवैद्य बांधकामाची नोंद होऊ नये म्हणून अर्ज दिला होता. तिघांनी पती संजय यांना मारहाण केली होती. मंचर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली होती.

तिघेही संजय वायाळ यांच्या कुटुंबाशी वारंवार भांडणे करत होते. संजय वायाळ यांची वडिलोपार्जित जमीन मिळावी असा प्रयत्न त्यांचा होता. आज सकाळी संजय वायाळ हे नाष्टा करून घराबाहेर पडले. दुपारी बारा वाजता ते सुलतानपूर रस्त्यालगत गवतामध्ये जखमी अवस्थेत मिळाले. बाजूलाच त्यांची मोटरसायकल तसेच भरत जानकू वायाळ यांची चारचाकी गाडी उभी होती. संजय वायाळ यांच्या गळ्यावर, डोक्यात,हातावर गंभीर जखमा आढळून आल्या. संजय वायाळ यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावले होते. ग्रामपंचायत कार्यालय एकलहरे येथे अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकु वायाळ आणि लक्ष्मण जानकू वायाळ यांच्या अवैद्य बांधकामाची नोंद होऊ नये असा अर्ज संजय वायाळ यांनी दिला होता.

त्याचा राग मनात धरून तसेच यापूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून त्यांनी साथीदारांच्या मदतीने धारदार हत्याराने संजय वायाळ यांचा खून केल्याची फिर्याद त्यांची पत्नी माधुरी वायाळ यांनी दिली आहे. पोलिसांनी अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकू वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचा बनाव करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व अमृत देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करत आहेत.

टॅग्स :MancharमंचरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक