शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

माहेरकडून गाडी घेऊन ये...! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 20:01 IST

पुण्यात राहायला आल्यावर शिवाजी याने अंजनीकुमारीला तुझ्या बापाने लग्नात मोटारसायकल दिली नाही

पुणे : माहेरकडून गाडी घेऊन न आल्याने पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (२१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर शिवाजी रमेशचंद्र मौर्या (२६, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

याबाबत विवाहितेचा भाऊ विजयबहादूर पतीराम मौर्या (वय २७, रा. सेमरा, सोनपूर, ता. जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लहान बहीण अंजनीकुमारी मौर्या हिचा विवाह शिवाजी मौर्या याच्याशी २८ एप्रिल रोजी झाला. लग्नामध्ये समाजातील रीतीरिवाजाप्रमाणे मान पान, फर्निचर, संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. लग्नानंतर काही दिवस गावाला राहून ४ महिन्यांनंतर ते लोणीकंद येथील बारावा मैल येथे राहू लागले.

पुण्यात राहायला आल्यावर शिवाजी याने अंजनीकुमारीला तुझ्या बापाने लग्नात मोटारसायकल दिली नाही, या कारणावरून वारंवार शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पतीकडून होणारा त्रास तिने फोन करून आपल्या वडिलांनी सांगितला. वडिलांनी जावयाला आर्थिक स्थिती हालाखीची आहे, आम्हाला समजून घ्या, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही तो त्रास देतच होता. शेवटी या त्रासाला कंटाळून अंजनीकुमारीने १६ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे