शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही; प्रफुल्ल पटेल यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 21:37 IST

पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर असून ते संपूर्ण देशाला देखील दिशा देऊ शकते

पुणे : देशाचा उड्डाण मंत्री असताना पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही. याचं कारण आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. आजही तिचं परिस्थिती असून, शिक्षण, कृषी, रोजगार, विज्ञान- तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांमध्ये अफाट क्षमता असलेल्या पुण्यात अजूनही विमानतळ होऊ शकले नसल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.

पुण्यभूषण फाउंडेशन व पुणेकरांच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक नितीन देसाई यांना प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शात्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं देगलूरकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, नितीन देसाई यांच्या पत्नी मीना देसाई, सिंबायिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि बांधकाम व्यावसायिक गजेंद्र पवार तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई उपस्थित होते.

पुणेकरांनी पुढाकार घेऊन पुण्यात अद्ययावत विमानतळ अस्तित्वात येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माजी केंद्रिय मंत्री पटेल यांनी व्यक्त केली. पुणे म्हणजे महाराष्ट्राची कला, साहित्य, सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक राजधानी आहे. आता राजकारणाची पण झाली आहे. समजले ना काय म्हणायचे आहे असा हळूच चिमटाही प्रफुल्ल पटेल यांनी काढला. पुण्याचे भौगोलिक स्थान आणि पुण्यातील वातावरण सर्वार्थाने पोषक आहे. आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बंगळुरू या शहराला देखील मागे टाकेल, एवढे बुद्धिजीवी लोक आणि माहिती-तंत्रज्ञान उद्योग पुण्यात आहेत. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकत असताना, त्याचा लाभ पुणेकरांनी घेतला पाहिजे. पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर असून ते संपूर्ण देशाला देखील दिशा देऊ शकते. सरकार कोणाचेही असले तरी, सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकेल, अशी शक्यता फार कमी असल्याने युवकांनी उद्योगांकडे वळले पाहिजे असेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना नितीन देसाई यांनी एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, दिशा, जनसेवा फाउंडेशन आदी संस्थांच्या माध्यमातून मी जे सामाजिक कार्य करीत आहे आणि या कार्यात मला ज्यांचा हातभार लागत आहे, त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत असल्याची भावना व्यक्त केली. सामाजिक कार्यात आलेले सुंदर अनुभवही त्यांनी कथन केले. ते पुढे म्हणाले, दातृत्व केवळ श्रीमंतांकडेच असते, हा समज खोटा ठरवत गरिबातील गरीब माणसाने माझ्या सामाजिक कामात दहा रूपयांचे योगदान दिलेले आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना नेहमी असे म्हणावेसे वाटते की, माझ्यातील सर्व चांगल्या गोष्टी मला समाजाला द्यायच्या असून, त्यातील कोणतीच गोष्ट माझ्याकडे शिल्लक राहू नये आणि शेवटी मी माझे सगळे समाजालाच अर्पण करावे. रित्या मनोवृत्तीने मी समर्पित व्हावे.

सध्या कोणत्याही गुजरातीला हिशोब विचारू नका

गुजराती व्यक्ती कधी हिशोब देत नाही असे नितीन देसाई यांनी मिश्कीलपणे सांगितले. तो धागा पकडत सध्या कोणत्याही गुजरातीला हिशोब विचारू नका अशी कोपरखळी प्रफुल्ल पटेल यांनी मारताच सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Puneपुणेprafull patelप्रफुल्ल पटेलPoliticsराजकारणAirportविमानतळGovernmentसरकारSocialसामाजिक