शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहर काँग्रेसमधील पुन्हा एकदा गटबाजी चव्हाट्यावर; परस्पर पत्रक काढण्याच्या प्रकारावर शहराध्यक्ष नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 14:44 IST

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर येत असून त्यातून पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत

ठळक मुद्दे लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पक्षातंर्गत गटबाजीबाबत कळवणार

पुणे: शहरातील महत्वाच्या विषयावर शहराध्यक्षांना कसलीही कल्पना न देता पक्षाचीच भूमिका असल्यासारखे पत्रक काढण्याच्या प्रकारावर काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहराच्या मध्यभागात नव्या बांधकामांना दीड ऐवजी दोन असा चटई क्षेत्र निदेर्शांक (एफएसआय) देण्याबाबत माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर येत असून त्यातून पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.रमेश बागवे म्हणाले, बालगुडे माजी नगरसेवक आहेत, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारीही आहेत. त्यांनी पत्रक प्रसिद्ध करण्यापुर्वी याविषयाची किमान कल्पना तरी शहराध्यक्ष म्हणून द्यायला हवी. हा महत्वाचा विषय आहे. शहराच्या मध्यभागातील पेठांमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या काही लाख नागरिकांशी तो संबधित आहे. त्याचबरोबर त्यात बांधकाम व्यावसायिक, अन्य काही मुद्देही आहेत. इतका महत्वाचा विषय शहराध्यक्षांना अंधारात ठेवून प्रसिद्ध करणे योग्य नाही. पक्षशिस्तीत ते बसत नाही. एकट्या बालगुडे यांच्याकडून या विषयाचा पाठपुरावा होणार आहे का? त्यांना पक्षाची ताकद लागणार नाही का? ते एकटे सरकारकडे गेले तर या विषयात काही निर्णय होईल का? या सर्व प्रश्नांनी उत्तरे नकारार्थी आहेत. तरीही त्यांनी असे का करावे हा त्याचा प्रश्न आहे, मात्र शहराध्यक्ष म्हणून ते मान्य नाही.असे विषय पक्षाकडून मांडले गेले तर त्याला वजन येते हे बालगुडे यांना माहिती नाही असे कसे म्हणता येईल असे प्रश्न करून बागवे म्हणाले, अलीकडे पक्षात प्रत्येकजणच मोठा पदाधिकारी व थेट वरिष्ठ नेत्यांबरोबर संबध असलेला असा होऊ लागला आहे. त्यातूनच मग एकाच विषयावर वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळी आंदोलने असे होत आहे. या सगळ्यातून पक्षाचे नुकसानच होत आहे.

महापालिकेची निवडणूक दोन वर्षावर आली असताना पक्षाला सशक्त करायचे सोडून असे प्रकार होत असतील तर त्याला आळा घालणे शहराध्यक्ष म्हणून माझे कामच आहे. त्यामुळे यासंबधी लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कळवणार आहे.बालगुडे यांनी मात्र ही पक्षाचीच भुमिका असल्याचे सांगितले. वैयक्तिक भूमिका घ्यायला मी काही बांधकाम व्यावसायिक नाही, किंवा त्यांच्यातील कोणी माझे मित्रही नाही. सन २००७ च्या विकास आराखड्यापासून हा विषय आहे. सन २०१५ मध्ये त्यावर पक्षाने हीच भूमिका घेतली होती. आताच्या अध्यक्षांनाही ते माहिती आहे. त्यामुळेच रस्त्यांची रुंदी सहा मिटर की नऊ मिटर या वादाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रक प्रसिद्ध केले असे बालगुडे म्हणाले. अध्यक्ष म्हणून त्यांना सांगायला हवे होते, मात्र त्यात पशशिस्तभंग होण्यासारखे काहीही नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. .....पक्षप्रमुखांशी बोललेच पाहिजेपक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, पक्षात काही गोष्टी चुकीच्या होत आहेत हे मान्य करायचा हवे. मला रस्तारुंदीच्या प्रश्नावर पत्र काढायचे होते. मी शहराध्यक्षांबरोबर बोललो, त्यांना विषय सांगितला व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्याचे मला उत्तरही आले. पक्षशिस्त म्हणून काही असते, तेच पाळले जात नाही. अशा मोठ्या विषयांवर पक्षातंर्गत चर्चा व्हायला हव्यात व नंतरच मत किंवा भूमिका जाहीर व्हायला हवी. तेच योग्य व पक्षहिताचे आहे हे आता सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारण