शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

माऊली अन् तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विश्वस्तांपासून सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:11 IST

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील विसावास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे

पुणे : वारकऱ्यांसह सर्वच पुणेकरांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील विसावास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिराच्या (नाना पेठ) व्यवस्थापनाने उत्सव मंडप उभारले असून, मंदिराला रंगरंगोटी, गाभाऱ्यात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होत असल्याने मंदिराच्या विश्वस्तांपासून ते सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. काेराेना संकटामुळे दाेन वर्षांनंतर पायी साेहळा निघत असल्याने दोन्ही मंदिरांतील व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंदिरांकडून तयारी पूर्ण झाली आहे. दाेन दिवसांचा पुणे मुक्काम करून पालख्या शुक्रवारी, २४ जूनला पहाटे प्रस्थान करणार आहेत.

जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे. मंदिराबाहेर महापालिकेकडून उत्सव मंडप उभारण्यात आला असून, त्यात विद्युत रोषणाई केली आहे. मंदिरातील चांदीच्या कमानींचे पॉलिश आणि मंदिराची साफसफाईही करण्यात आली आहेत. दिंडीतील वारकऱ्यांचा विसावा मंदिरातील सभागृहात असतो. त्याचीही साफसफाई केली आहे. जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार आहेत. त्यांच्यासाठी दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची सोय केली जाणार आहे. पालखीचे स्वागत विश्वस्तांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने होईल. भाविकांच्या दर्शनासाठी योग्य व्यवस्था केली असून, पुरुष आणि महिला अशा वेगवेगळ्या रांगेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात फुलांची आणि विद्युत रोषणाईची सजावट करणार आहोत असे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी सांगितले आहे. 

मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम पूर्ण 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामाचीही व्यवस्था केली आहे. दोन दिवस मंदिरात जवळपास ६ ते ७ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या दर्शनाची व्यवस्थाही केली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा न झाल्याने सर्वांमध्ये उत्साह असल्याचे भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामSocialसामाजिक