शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

माऊली अन् तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विश्वस्तांपासून सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:11 IST

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील विसावास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे

पुणे : वारकऱ्यांसह सर्वच पुणेकरांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील विसावास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिराच्या (नाना पेठ) व्यवस्थापनाने उत्सव मंडप उभारले असून, मंदिराला रंगरंगोटी, गाभाऱ्यात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होत असल्याने मंदिराच्या विश्वस्तांपासून ते सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. काेराेना संकटामुळे दाेन वर्षांनंतर पायी साेहळा निघत असल्याने दोन्ही मंदिरांतील व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंदिरांकडून तयारी पूर्ण झाली आहे. दाेन दिवसांचा पुणे मुक्काम करून पालख्या शुक्रवारी, २४ जूनला पहाटे प्रस्थान करणार आहेत.

जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे. मंदिराबाहेर महापालिकेकडून उत्सव मंडप उभारण्यात आला असून, त्यात विद्युत रोषणाई केली आहे. मंदिरातील चांदीच्या कमानींचे पॉलिश आणि मंदिराची साफसफाईही करण्यात आली आहेत. दिंडीतील वारकऱ्यांचा विसावा मंदिरातील सभागृहात असतो. त्याचीही साफसफाई केली आहे. जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार आहेत. त्यांच्यासाठी दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची सोय केली जाणार आहे. पालखीचे स्वागत विश्वस्तांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने होईल. भाविकांच्या दर्शनासाठी योग्य व्यवस्था केली असून, पुरुष आणि महिला अशा वेगवेगळ्या रांगेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात फुलांची आणि विद्युत रोषणाईची सजावट करणार आहोत असे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी सांगितले आहे. 

मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम पूर्ण 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामाचीही व्यवस्था केली आहे. दोन दिवस मंदिरात जवळपास ६ ते ७ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या दर्शनाची व्यवस्थाही केली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा न झाल्याने सर्वांमध्ये उत्साह असल्याचे भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामSocialसामाजिक