शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांची स्वप्ने कागदावरच! स्मार्ट सिटीच्या नावाखाली जाहीर केले ५८ प्रकल्प, पूर्ण झाले केवळ २०

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:00 IST

केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दर्जेदार नागरी सुविधांसाठी २०१६ मध्ये स्मार्ट सिटी योजना जाहीर केली

राजू हिंगे 

पुणे : पुणे शहरात स्मार्ट सिटीने ५८ प्रकल्प करणार असल्याचे जाहीर केले होते, पण त्यापैकी अवघे २० प्रकल्प पूर्ण झाले आहे. त्यामुळे सिटीच्या नावाखाली पुणेकरांना दाखविलेली स्वप्ने कागदावरच राहिली.

केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दर्जेदार नागरी सुविधांसाठी २०१६ मध्ये स्मार्ट सिटी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पुणे शहराचा नंबर पहिल्या टप्प्यामध्ये लागला होता. त्यानंतर, एरिया डेव्हलपमेंट अंतर्गत औंध बाणेर बालेवाडी या परिसराची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात विविध प्रकल्प सुमारे ५८ प्रकल्प स्वीकारण्यात आले. मात्र, स्मार्ट सिटीच्या गोंडस नावाखाली सातत्याने चर्चेत राहणाऱ्या, मात्र या कंपनीने गेल्या साडेपाच वर्षांत २० प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

हे राहिले अपूर्ण प्रकल्प

स्मार्ट सिटीची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यात आपेन मार्कट, फायर स्टेशन, गार्डन, डिफेन्स थीम पार्क याचा समावेश आहे. सलग सायकल ट्रॅक, ई-रिक्षा आल्याच नाहीत. अनेक प्रकल्पांवर अनावश्यक खर्च झाला. ‘प्लेसमेकिंग’मध्ये थोडे-फार काम झाले. राम नदीचे सर्वेक्षणही झाले नाही. ‘स्टार्टअप्स’नाही संधी दिली गेली नाही.

८९० कोटींचा निधी मिळाला

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आता पर्यत एकूण ८९० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यात केंद्र सरकारचे ४९० कोटी, राज्य सरकारचे २४५ कोटी, २२० कोटी पुणे महापालिकेने दिलेले आहेत. अद्यापही पुणे महापालिकेकडून २५ कोटी रुपये येणे बाकी आहे.

कामे पालिकेची नाव स्मार्ट सिटीच

वीज बचत आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शहरातील सुमारे ८० हजारांहून अधिक खांबांवर एलईडी स्क्रीन एलईडी फिटिंग बसविण्यात आलेल्या आहे. पीएमपीएलने ई-बसेस घेतल्या आहेत. पुणे महापालिका आणि पीएमपीएमएलने ही कामे स्वतःच्या निधीतून केलेले आहेत. त्यामुळे पालिकेने केलेली कामे स्मार्ट सिटी दाखवत आहे.

साडेपाच वर्षांत ‘स्मार्ट सिटी’ला पाच सीईओ

स्मार्ट सिटी कंपनीला सुरुवातील कुणाल कुमार सीईओ होते. त्यानंतर, प्रेरणा देशभातर, राजेद जगताप, रुबल अगवाल हे सीईओ झाले. संजय कोलते हे सीईओपदाची जबाबदारी संभाळत आहे. गेल्या साडेपाच वर्षांत पाच सीईओ झाले आहेत.

''स्मार्ट सिटीला केवळ तोंडी मुदतवाढ दिली आहे. गाजावाजा करून दाखविलेली स्वप्ने, स्वप्नेच राहिली. काही ठिकाणी केलेले ‘सिव्हिल वर्क’ म्हणजे विकास नाही. कचरा वर्गीकरण, बॅटरीवरची वाहने हे प्रकल्प मार्गी लागले नाहीत. केवळ रस्ते छोटे करून पदपथ मोठे करण्यातच पैसा व वेळ वाया गेला. राम नदीचे सर्वेक्षणही झाले नाही,’ असे स्मार्ट सिटीचे माजी संचालक पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.''

''स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. केंद्र सरकारची ही योजना होती. केंद्रातील सत्ताधारी भाजप ही योजना राबविण्यात अपयशी ठरले आहे, असे स्मार्ट सिटीचे माजी संचालक रवीद्र धंगेकर यांनी सांगितले.''

''स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प २०२३च्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. स्मार्ट सिटीने ई-बस, विजेच्या खांबावर एलईडी लायटिंग बसविली आहे. त्याचबरोबर, बालेवाडी येथे १६ किलोमीटर, बाणेर येथे अनुक्रमे १० किलोमीटर आणि ७ किलोमीटरचे रस्ते तयार केले आहे. स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिका, पीएमपीएमएलने एकत्रित प्रकल्प राबविले आहेत. - संजय कोलते, सीईओ, स्मार्ट सिटी पुणे.'' 

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकार