शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Pune News: विद्येच्या माहेरघरात अग्रेसर असं पुणे; दुर्दैवाने कौटुंबिक हिंसाचारात टॉपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:35 IST

गेल्या ६ महिन्यांत पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) 296 घटनांची नोंद, त्यापाठोपाठ मुंबई आणि नागपूरचा क्रमांक

नम्रता फडणीस

पुणे : विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असा पुण्याचा नावलौकिक; पण, दुर्दैवाने आता ‘सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार’ करणारे शहर अशी नवीन ओळख निर्माण हाेत आहे. राज्यात अन्य शहरांच्या तुलनेत कौटुंबिक हिंसाचारात (Domestic Violence) पुणे अग्रेसर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या 296 घटनांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई आणि नागपूरचा क्रमांक लागताे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा महिन्यांत विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देण्यासंबंधीचे ३१२ गुन्हे नोंदविले गेले आहेत. याचाच अर्थ महिलांवरील अत्याचारातही पुणे उणे नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळामध्ये महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना प्रकर्षाने समोर आल्या. दिवसागणिक हे प्रमाण वाढतच चालले आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार ४५ टक्के भारतीय स्त्रियांना त्यांचे नवरे थोबाडीत मारतात, लाथा मारतात किंवा मारहाण करतात. ३२ टक्के नवऱ्यांनी पत्नी गरोदर असताना तिच्याविरोधात हिंसाचार केलेला आहे. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. सामाजिक संकेतांमुळे स्त्रिया कौटुंबिक हिंसाचार सहन करतात. तसेच संस्कृतीची बंधने आणि आर्थिक परावलंबित्व यामुळे स्त्रियांना पतीच्या घरी राहणे भाग पडत असल्याचे दिसते. मात्र यातील दुर्दैवी बाब म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातही महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे.

सहा महिन्यांत 312 गुन्ह्यांची नोंद

पुण्यात गेल्या सहा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचारांतर्गत एकूण 312 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मेमध्ये हे प्रमाण 249 इतके होते. गतवर्षी जूनमध्ये 201 गुन्हे नोंदविले होते. वर्षभरातच 100 पेक्षा अधिक गुन्हे वाढले आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये 276, तर नागपूरमध्ये 260 गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांमध्ये होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व नियम 2006 संपूर्ण भारतात लागू केला आहे. या कायद्याच्या जनजागृतीमुळे कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही काहीअंशी जमेची बाजू म्हणता येत असली तरी काही महिला या कायद्याचा गैरवापर करीत असल्याचेही दिसून येत आहे.

हा आहे, कौटुंबिक हिंसाचार, वेळीच ओळखा आणि जागे व्हा!

- भाषिक किंवा भावनिक हिंसाचार- आई-वडिलांवर आरोप करणे / त्यांचा अपमान करणे- शिवीगाळ करणे (नेम-कॉलिंग)- चारित्र्यावर किंवा वर्तनावर आरोप करणे- हुंडा न दिल्याबद्दल अपमान करणे- मुलगा जन्माला न घातल्याबद्दल अपमान करणे- शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थिती लावण्यास प्रतिबंध करणे- नोकरी करण्यास प्रतिबंध करणे- नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती करणे- स्वत:च्या किंवा मुलांच्या देखभालीसाठी पैसे न देणे- मुलांना अन्न, कपडे, औषधे न पुरवणे- घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे- थोबाडीत मारणे, मारहाण करणे, आपटणे- लाथा मारणे, बुक्के मारणे, ढकलणे, लोटून देणे- जबरदस्तीने शारीरिक संभोग करणे- पोर्नोग्राफी किंवा अन्य काही अश्लील साहित्य किंवा चित्रे बघण्याची जबरदस्ती करणे.

काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर 

कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येची व्याप्ती मोठी आहे. यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हिंसाचाराचाही समावेश आहे. कोरोना काळापासून महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुरुषांच्या मनात महिलांविषयी आदर राहिलेला नाही. अनेक पुरुषांना पत्नी ओझे वाटू लागली आहे. कायद्याविषयी महिला जागृत झाल्याने त्या तक्रार करण्यास पुढे येत आहेत. पण, हेही तितकेच खरे आहे की, काही महिला कायद्याचा गैरवापर करीत आहेत. परिणामी, ज्या महिला खराेखर पीडित आहेत, त्यांच्यावर अन्याय होत आहे. - ॲड. स्मिता भोसले

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाDomestic Violenceघरगुती हिंसाPoliceपोलिसCourtन्यायालय