शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुणे जिल्ह्यातील पावसाचा खंड ३५ दिवसांचा, ५४ मंडळामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू

By नितीन चौधरी | Updated: August 31, 2023 15:06 IST

कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी दिले आहेत...

पुणे : जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड जवळपास २२ ते तब्बल ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी ६८४ मिलिमीटर पावसाच्या तुलनते हा पाऊस केवळ ६७ टक्केच आहे. सर्वांत कमी पाऊस पुरंदर तालुक्यात केवळ ३८ टक्के झाला असून हवेलीत ३९ तर बारामतीत केवळ ४० टक्के झाला आहे. इंदापूर, दौंड शिरूर या तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. पावसाचा खंड एक महिन्यापेक्षा अधिक झाल्याने खरीप पिकांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप पिक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त असल्यास अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण उत्पादनात ५० टक्के जास्त घट असल्यास त्यांना मिळणाऱ्या पीक विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम आगाऊ दिली जाते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पीक विमा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी काढणार अधिसूचना- 

या बैठकीत जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये पिकांचे सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी दिले. हे सर्वेक्षण करताना पीक विम्यासाठी नोंद झालेल्या १४ पिकांसाठीच हे सर्वेक्षण केले जाणार आहे. एका महसूल मंडळातील ठराविक पीक क्षेत्राची तपासणी ढोबळमानाने केली जाणार आहे. त्यावरून उत्पादनात नेमकी किती घट झाली आहे हे निश्चित केली जाईल तसा अहवाल विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी त्यानुसार नुकसान भरपाईसाठीची अधिसूचना जारी करतील. त्यानंतर एकूण नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील ७७ मंडळामध्येही ८० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस आहे. येथेही येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास पिकांची स्थिती बिकट होईल.- संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस