शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नुकसानग्रस्त भागाचे जलदगतीने पंचनामे करा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 17:37 IST

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात नागरिकांच्या घरांचे व शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजोरदार पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस व फळबागा अडचणीत

कळस : पुणे जिल्ह्यासह इंदापुर तालुक्यात परतीच्या वादळी पावसाने द्राक्षे,डाळिंब, ऊस व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे व शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. यासर्व नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तालुक्यातील प्रशासनाला दिल्या आहेत.याबाबत ‘लोकमत’शी बोलताना भरणे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यासह तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस  व फळबागा अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे व जमिनीचे बांध वाहुन गेल्याने नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची दुरावस्था झाली आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र इंदापूर शहर व तालुक्यातील काही भागांची पाहणी केली आहे. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिकांसह घरे व पशुधनाचेही पंचनामे होणार आहेत.

जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने कार्यवाही चालु केली आहे. नागरिकांनी आपले तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक याच्यांशी संपर्क करून या नुकसानग्रस्त नागरिकांनी आपले नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत, कोणीही  वंचित राहणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. सांयकाळ पर्यंत नजर अंदाज आकडेवारी समजेल. अजुनही पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.————————————————...अतिवृष्टीने दोन्ही घटक कोलमडलेकोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे अगोदरच  लहान मोठा शेतकरी,व्यापारी अडचणीत सापडला आहे. त्यातच झालेल्या या अतिवृष्टीमुळे  शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही घटक पुरते कोलमडुन गेले आहेत.त्यामुळे विभागीय आयुक्तांनी कोणत्याहि आदेशाची वाट न पाहता.सरसकट पंचनामे करण्याचे आदेश काढावेत,अशी मागणी भाजपचे भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी केली आहे. ———————————

टॅग्स :IndapurइंदापूरRainपाऊसFarmerशेतकरीministerमंत्री