शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 23:58 IST

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे.

चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्याआगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे. त्याचबरोबर देशात स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जेणेकरून तरुणांचे शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर कमी होईल. सोबतच ज्या क्षेत्राचे शिक्षण घेतले त्यानुसारच रोजगार मिळावा. उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी वाढीव शिष्यवृत्ती द्यावी. परंतु सध्याची परिस्थिती बघता रोजगार आणि शिक्षण हे मुद्दे निवडणूक प्रचारात मागे पडले आहेत.- राहुल दळवी, विद्यार्थीआमची मागणी पूर्ण व्हायला हवीआम्हाला कॉलेजला दुचाकीवरून यावे लागते. त्यामुळे त्याला इंधन लागतंच. त्याचे दर आवाक्यात आणणं ही आमची प्रामुख्याने अपेक्षा आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत, रोजच्या वाढत्यामहागाईनं आमच्यापालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता जगणं अवघड झालं आहे. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, महागाई कमी व्हावी ही तर आमची कित्येक वर्षांपासूनची मागणीआहे. आता तरी आमची मागणी पूर्ण होईल, अशी इच्छा आहे.- गोपाळ ओझा, विद्यार्थीमहागाई कमीझालीच पाहिजेआम्ही पहिल्यांदाच मतदान करतोय. महागाई खूप वाढत चालली आहे. दोन वेळेचं जेवण सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. देशातील जनतेला रोजगार देणारं सरकार असणं आवश्यक आहे. आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणात आवश्यक असलेल्या सवलती मिळणे बंद झाले आहे. त्या नियमित मिळणे आवश्यक आहे. विकास व उत्तम प्रशासन असा चहूबाजूने सर्वसमावेशक विचार करणारा नेता, खासदार आम्हाला हवाय. तरच बहुसंख्य युवक असलेल्या देशातील तरुणांचे प्रश्न सुटतील, असे वाटते.- अनिकेत मदने, विद्यार्थीउमेदवार शिक्षित असायला हवाआज आपल्याला राजकीय पक्ष, त्याने उभा केलेला उमेदवार हे पाहून मतदान करावं लागतं. उमेदवार हा उच्चशिक्षितच असला पाहिजे. आमचा खासदार तरुण असावा, त्यामुळे त्याने तरुणांचे प्रश्न समजून घ्यावेत, बेरोजगारीवर मात करून युवकांना शिलेदार म्हणून प्रोजेक्ट करणारा असावा. उमेदवार शिक्षित व प्रगल्भ असावा. स्थानिक पातळीवरील तरुण-तरुणी, नागरिक यांचे प्रश्न त्यांना समजतील आणि त्या दृष्टीने तसे उपक्रम राबविणारा नेता पाहिजे. तो उच्चशिक्षित असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगल्या योजना तो राबवू शकतो. - रोहित पांडे, युवकतरुणांना केंद्रस्थानीठेवून विचार करावानिवडणुका धर्म आणि जातिआधारित राजकारणावर केंद्रित झाल्या आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यक्तिगत मुद्यांवरून चिखलफेक ही नेत्यांकडून राजकीय मंचावरून होताना दिसत आहे. ती बंद होणे आवश्यक आहे तरच देशातील वातावरण चांगले राहील. प्रत्येक पक्ष, भारत हा तरुणांचा देश, उद्याचे भविष्य आहे, असे सांगत असतो. परंतु वास्तवात राजकीय नेते आमच्याकडे केवळ मतदार म्हणून पाहतात. म्हणून या निवडणुकीत तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा विकास कसा होईल, या मुद्यांवर त्यांनी लक्ष द्यावे.- काजोल बोडरे, विद्यार्थी

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानPuneपुणे