शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 23:58 IST

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे.

चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्याआगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे. त्याचबरोबर देशात स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जेणेकरून तरुणांचे शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर कमी होईल. सोबतच ज्या क्षेत्राचे शिक्षण घेतले त्यानुसारच रोजगार मिळावा. उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी वाढीव शिष्यवृत्ती द्यावी. परंतु सध्याची परिस्थिती बघता रोजगार आणि शिक्षण हे मुद्दे निवडणूक प्रचारात मागे पडले आहेत.- राहुल दळवी, विद्यार्थीआमची मागणी पूर्ण व्हायला हवीआम्हाला कॉलेजला दुचाकीवरून यावे लागते. त्यामुळे त्याला इंधन लागतंच. त्याचे दर आवाक्यात आणणं ही आमची प्रामुख्याने अपेक्षा आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत, रोजच्या वाढत्यामहागाईनं आमच्यापालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता जगणं अवघड झालं आहे. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, महागाई कमी व्हावी ही तर आमची कित्येक वर्षांपासूनची मागणीआहे. आता तरी आमची मागणी पूर्ण होईल, अशी इच्छा आहे.- गोपाळ ओझा, विद्यार्थीमहागाई कमीझालीच पाहिजेआम्ही पहिल्यांदाच मतदान करतोय. महागाई खूप वाढत चालली आहे. दोन वेळेचं जेवण सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. देशातील जनतेला रोजगार देणारं सरकार असणं आवश्यक आहे. आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणात आवश्यक असलेल्या सवलती मिळणे बंद झाले आहे. त्या नियमित मिळणे आवश्यक आहे. विकास व उत्तम प्रशासन असा चहूबाजूने सर्वसमावेशक विचार करणारा नेता, खासदार आम्हाला हवाय. तरच बहुसंख्य युवक असलेल्या देशातील तरुणांचे प्रश्न सुटतील, असे वाटते.- अनिकेत मदने, विद्यार्थीउमेदवार शिक्षित असायला हवाआज आपल्याला राजकीय पक्ष, त्याने उभा केलेला उमेदवार हे पाहून मतदान करावं लागतं. उमेदवार हा उच्चशिक्षितच असला पाहिजे. आमचा खासदार तरुण असावा, त्यामुळे त्याने तरुणांचे प्रश्न समजून घ्यावेत, बेरोजगारीवर मात करून युवकांना शिलेदार म्हणून प्रोजेक्ट करणारा असावा. उमेदवार शिक्षित व प्रगल्भ असावा. स्थानिक पातळीवरील तरुण-तरुणी, नागरिक यांचे प्रश्न त्यांना समजतील आणि त्या दृष्टीने तसे उपक्रम राबविणारा नेता पाहिजे. तो उच्चशिक्षित असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगल्या योजना तो राबवू शकतो. - रोहित पांडे, युवकतरुणांना केंद्रस्थानीठेवून विचार करावानिवडणुका धर्म आणि जातिआधारित राजकारणावर केंद्रित झाल्या आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यक्तिगत मुद्यांवरून चिखलफेक ही नेत्यांकडून राजकीय मंचावरून होताना दिसत आहे. ती बंद होणे आवश्यक आहे तरच देशातील वातावरण चांगले राहील. प्रत्येक पक्ष, भारत हा तरुणांचा देश, उद्याचे भविष्य आहे, असे सांगत असतो. परंतु वास्तवात राजकीय नेते आमच्याकडे केवळ मतदार म्हणून पाहतात. म्हणून या निवडणुकीत तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा विकास कसा होईल, या मुद्यांवर त्यांनी लक्ष द्यावे.- काजोल बोडरे, विद्यार्थी

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानPuneपुणे