शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 23:58 IST

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे.

चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्याआगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे. त्याचबरोबर देशात स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जेणेकरून तरुणांचे शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर कमी होईल. सोबतच ज्या क्षेत्राचे शिक्षण घेतले त्यानुसारच रोजगार मिळावा. उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी वाढीव शिष्यवृत्ती द्यावी. परंतु सध्याची परिस्थिती बघता रोजगार आणि शिक्षण हे मुद्दे निवडणूक प्रचारात मागे पडले आहेत.- राहुल दळवी, विद्यार्थीआमची मागणी पूर्ण व्हायला हवीआम्हाला कॉलेजला दुचाकीवरून यावे लागते. त्यामुळे त्याला इंधन लागतंच. त्याचे दर आवाक्यात आणणं ही आमची प्रामुख्याने अपेक्षा आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत, रोजच्या वाढत्यामहागाईनं आमच्यापालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता जगणं अवघड झालं आहे. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, महागाई कमी व्हावी ही तर आमची कित्येक वर्षांपासूनची मागणीआहे. आता तरी आमची मागणी पूर्ण होईल, अशी इच्छा आहे.- गोपाळ ओझा, विद्यार्थीमहागाई कमीझालीच पाहिजेआम्ही पहिल्यांदाच मतदान करतोय. महागाई खूप वाढत चालली आहे. दोन वेळेचं जेवण सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. देशातील जनतेला रोजगार देणारं सरकार असणं आवश्यक आहे. आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणात आवश्यक असलेल्या सवलती मिळणे बंद झाले आहे. त्या नियमित मिळणे आवश्यक आहे. विकास व उत्तम प्रशासन असा चहूबाजूने सर्वसमावेशक विचार करणारा नेता, खासदार आम्हाला हवाय. तरच बहुसंख्य युवक असलेल्या देशातील तरुणांचे प्रश्न सुटतील, असे वाटते.- अनिकेत मदने, विद्यार्थीउमेदवार शिक्षित असायला हवाआज आपल्याला राजकीय पक्ष, त्याने उभा केलेला उमेदवार हे पाहून मतदान करावं लागतं. उमेदवार हा उच्चशिक्षितच असला पाहिजे. आमचा खासदार तरुण असावा, त्यामुळे त्याने तरुणांचे प्रश्न समजून घ्यावेत, बेरोजगारीवर मात करून युवकांना शिलेदार म्हणून प्रोजेक्ट करणारा असावा. उमेदवार शिक्षित व प्रगल्भ असावा. स्थानिक पातळीवरील तरुण-तरुणी, नागरिक यांचे प्रश्न त्यांना समजतील आणि त्या दृष्टीने तसे उपक्रम राबविणारा नेता पाहिजे. तो उच्चशिक्षित असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगल्या योजना तो राबवू शकतो. - रोहित पांडे, युवकतरुणांना केंद्रस्थानीठेवून विचार करावानिवडणुका धर्म आणि जातिआधारित राजकारणावर केंद्रित झाल्या आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यक्तिगत मुद्यांवरून चिखलफेक ही नेत्यांकडून राजकीय मंचावरून होताना दिसत आहे. ती बंद होणे आवश्यक आहे तरच देशातील वातावरण चांगले राहील. प्रत्येक पक्ष, भारत हा तरुणांचा देश, उद्याचे भविष्य आहे, असे सांगत असतो. परंतु वास्तवात राजकीय नेते आमच्याकडे केवळ मतदार म्हणून पाहतात. म्हणून या निवडणुकीत तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा विकास कसा होईल, या मुद्यांवर त्यांनी लक्ष द्यावे.- काजोल बोडरे, विद्यार्थी

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानPuneपुणे