शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माझी वसुंधरा अभियान : 'पंचतत्त्वा'नुसार होणार पुणे जिल्ह्याच्या पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 15:35 IST

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या तत्त्वाची घेतली जाणार काळजी 

ठळक मुद्देचांगली कामे करणाऱ्या गावांचा, नगरपरिषदांचा व पालिकांचा गौरव केला जाणार जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणारपृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ही पंचतत्त्वे अभियानासाठी आधारभूत

पुणे : राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेस १३ नगरपरिषदा आणि  २६ मोठ्या गावांचा समावेश आहे. वरील पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने कामे केली जाणार आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत १५०० गुण आहेत

जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून हे अभियान सुरू झाले आहे. ज्या गावांची लोकसंख्या ही १० हजारांच्या वर आहे अशा गावांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने या साठी ३४ गावे निवडली होती. मात्र, यातील काही गावे ही पुणे आणि पिंपरी पालिकेत गेली आहे. त्यामुळे ही गावे वगळून  २६ गावे या अभियानासाठी निवडली आहेत.पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ही पंचतत्त्वे अभियानासाठी आधारभूत ठेवण्यात आली आहे.

पृथ्वी पंचतत्त्वांनुसार : गावातील सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि जमिनीचे धुपीकरण ही कामे केली जाणार आहेत. आतापर्यंत ५२ हजार ५८४ झाडे लावण्यात आली आहेत.  यात ५० टक्के झाडे ही देशी आहेत. वायू पंचतत्त्वानुसार  हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. आतापर्यंत वायु परिक्षण झाले नसले तरी झाडे लावण्यात आली आहे.

जल पंचतत्त्वानुसार : नदीसंवर्धन, जैवविविधता जतन करणे, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे आणि नदीकिनाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. या विभागात ओढा खोलीकरणाची कामे झाली आहेत. तर रेनवाॉटर हार्वेस्टिंगचे ३८ कामे झाली आहेत. नद्यांच्या स्वच्च्छतेसाठी ही कामे हाती घेण्यात आली आहे.

अग्नी तत्त्वांनुसार : ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, त्याचा अपव्यय टाळून, त्यात बचत करणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूने रिकाम्या असलेल्या जागा, पडीक जमिनी आणि शेताचे बांध यासारख्या जागांवर पारंपरिक ऊर्जेबाबतचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. या तत्वानुसार आतापर्यंत सौर उर्जेवरील ४ हजार ४७३ एलईडी, १८० बायोगॅस प्रकल्प तर ५८ सौर पंप लावण्यात आहे. यात आणखी वाढ  होणार आहे.

आकाश तत्त्वानुसार : स्थळ आणि प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे. यासाठी फ्लेक्स, बॅनर हे निवडण्यात आलेल्या गावांत लावले जात आहे.

......................

गावांचा होणार गौरवराज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्वानुसार चांगली कामे करणाऱ्या गावांचा, नगरपरिषदांचा व पालिकांचा गौरव केला जाणार आहे.  १५०० गुणांचे हे अभियान असणार आहे. पृथ्वी  ६०० गुण, वायू   १०० गुण, जल  ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुण, एकूण १५०० गुण असे मिळून १५०० गुण या अभियानासाठी आहेत.  पुणे आणि पिंपरी शहरांचा समावेश असून त्यांना अमृत शहरे ही नाव देण्यात आले आहे.  

..............

जिल्ह्यातील स्पर्धेसाठी निवडलेली गावेनिमगाव केतकी,  बावडा, आंबेगाव खुर्द, कडुस,  वारूळवाडी, वरवंड, आळे,   इंदुरी, कळंब, पाटस, माळेगाव बुद्रूक, कदमवाकवस्ती, नारायणगाव, लोणी काळभोर,  शिक्रापूर, बारामती ग्रामीण, ओतूर,  उरुळीकांचन, तळेगाव ढमढेरे,  राहू, बोरीपार्धी, रांजणगाव गणपती, यवत.

..............या अभियानाची जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार निवडण्यात आलेल्या गावांत कामे सुरू आहेत. ही सर्व गावे त्यांची उद्दीष्ट पूर्ण करणार आहेत.-आयुष प्रसाद, मुख्य कायर्यकारी अधिकारी

 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणzpजिल्हा परिषदState Governmentराज्य सरकार