शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sahyadri Express | सह्याद्री एक्‍स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाकडे

By नितीश गोवंडे | Updated: April 21, 2023 15:35 IST

सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे....

पुणे : पुणे रेल्वे विभागाने मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाला पाठवला असल्याची माहिती पुणे विभागाचे रेल्वे अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

सह्याद्री एक्‍स्प्रेस कोल्हापूरवरून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी वाजता सुटायची आणि पुण्यात सकाळी ०६:५० पर्यंत येऊन मुंबईला (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ११:५० वाजेपर्यंत पोहोचत असे. तर मुंबईवरून (सीएसएमटी) सायंकाळी ०५:५० वाजता सुटून पुण्यात रात्री ०९:५५ वाजेपर्यंत पोहोचत असल्यामुळे दररोज कामानिमित्त पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही रेल्वे सोयीस्कर होती. पण, रेल्वे प्रशासनाने काही कारणास्तव ही सेवा मागच्या वर्षी बंद केली. सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाल्यामुळे कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईला दररोज कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.

रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात होती. तसेच पुण्यातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून मागच्या पंधरा दिवसांमध्ये पाच वेळा मारामारी झाल्याच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करत, पुणे रेल्वे विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला जाणार असून रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळाल्यावर ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे.सुपरफास्टचा दर्जा द्यावा..

सह्याद्री एक्स्प्रेसचे जुने कोच बदलून त्या रेल्वेला नवीन एलएचबी कोच लावून या रेल्वेला सुपरफास्ट रेल्वेचा दर्जा द्यावा. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांना याचा खूप फायदा होणार आहे.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी