शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात सरकारी पुरावे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:58 IST

देशातील शेवटचे टाडा प्रकरण असलेल्या या खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर सुरू आहे टाडा खटला चालविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे९ आॅक्टोबर १९८९ ला रेल्वे स्थानकावर पेपर वाचत बसले असताना बिल्डर दुबे यांची गोळ्या झाडून हत्या २००४ मध्ये याप्रकरणी खूनप्रकरणी, टाडाचे आरोप निश्चित

पुणे : विरार येथील बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणात सरकारी पक्षांकडून पुरावे घेण्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद होऊन पुढील काही महिन्यांमध्ये या खटल्यांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.    देशातील शेवटचे टाडा प्रकरण असलेल्या या खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर सुरू आहे टाडा खटला चालविण्यात येत आहे. सुरेश दुबे यांनाही जागेचा ताबा सोडावा आणि हप्ता देण्याबाबत घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या भाई ठाकूर यांच्यामार्फत देण्यात आल्या होत्या. गुंडाकडून ज्या जागेवर ताबा मारला गेला, ती जागा खाली करण्यासाठी दबाब येऊ लागल्यानंतर सुरेश दुबे यांनी वकीलांमार्फत ठाकूर यांना नोटीस बजावली होती. याच कारणातून ९ आॅक्टोबर १९८९ (वय २९ वर्षांपूर्वी)ला बिल्डर दुबे हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर पेपर वाचत बसले असताना त्यांची ६ ते ७ आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. १९९२ साली यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांचीही आरोपी करण्यात आले होते. पोलीस आरोपींना साथ देत आहेत. त्यामुळे मुख्य आरोपी सोडून पोलिसांनी इतरांना अटक केली, अशी चर्चा होती. याप्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आनंद पाडेकर यांचा सहभाग असल्याचे आरोप झाले.          १९९२ मध्ये स्थानिक राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर फिर्यादी डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी रेल्वे पोलीस महासंचलकांकडे दाद मागितली होती. १६ मे १९९७ रोजी १७ आरोपींना पुणे टाडा न्यायालयाने सोडले. त्यामुळे डॉ. दुबे यांनी अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक अनंत पाटील यांना सुरेश दुबे हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी या गुन्ह्यात फरार असलेले जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दिपक ठाकूर, गजानन अनंत पाटील, संजय चैत्या कडू, पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाडेकर यांच्यावर तसेच सध्या मृत असलेले भास्कर ठाकूर आणि नारायण गौडा यांच्या विरुध्द पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले.          २००४ मध्ये याप्रकरणी खूनप्रकरणी, टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अ‍ॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले. आत्तापर्यंत याप्रकरणी सरकारी पक्षाने १०२ साक्षीदार तपासले असून २ हजार ६०० पेक्षा अधिक कागदपत्रे न्यायालयासमोर आली आहेत. याप्रकरणी खटल्यातील विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ सतिश मिश्रा यांनी न्यायालयाला सरकार पक्षाचे पुरावे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. संजय जैन यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून फिर्यादीच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी शनिवारी न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावरील सुनावणी १७ आॅक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, भारतातील हा शेवटचा टाडा खटला असल्याचे अ‍ॅड. मिश्रा यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून