शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात सरकारी पुरावे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:58 IST

देशातील शेवटचे टाडा प्रकरण असलेल्या या खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर सुरू आहे टाडा खटला चालविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे९ आॅक्टोबर १९८९ ला रेल्वे स्थानकावर पेपर वाचत बसले असताना बिल्डर दुबे यांची गोळ्या झाडून हत्या २००४ मध्ये याप्रकरणी खूनप्रकरणी, टाडाचे आरोप निश्चित

पुणे : विरार येथील बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणात सरकारी पक्षांकडून पुरावे घेण्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद होऊन पुढील काही महिन्यांमध्ये या खटल्यांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.    देशातील शेवटचे टाडा प्रकरण असलेल्या या खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर सुरू आहे टाडा खटला चालविण्यात येत आहे. सुरेश दुबे यांनाही जागेचा ताबा सोडावा आणि हप्ता देण्याबाबत घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या भाई ठाकूर यांच्यामार्फत देण्यात आल्या होत्या. गुंडाकडून ज्या जागेवर ताबा मारला गेला, ती जागा खाली करण्यासाठी दबाब येऊ लागल्यानंतर सुरेश दुबे यांनी वकीलांमार्फत ठाकूर यांना नोटीस बजावली होती. याच कारणातून ९ आॅक्टोबर १९८९ (वय २९ वर्षांपूर्वी)ला बिल्डर दुबे हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर पेपर वाचत बसले असताना त्यांची ६ ते ७ आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. १९९२ साली यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांचीही आरोपी करण्यात आले होते. पोलीस आरोपींना साथ देत आहेत. त्यामुळे मुख्य आरोपी सोडून पोलिसांनी इतरांना अटक केली, अशी चर्चा होती. याप्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आनंद पाडेकर यांचा सहभाग असल्याचे आरोप झाले.          १९९२ मध्ये स्थानिक राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर फिर्यादी डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी रेल्वे पोलीस महासंचलकांकडे दाद मागितली होती. १६ मे १९९७ रोजी १७ आरोपींना पुणे टाडा न्यायालयाने सोडले. त्यामुळे डॉ. दुबे यांनी अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक अनंत पाटील यांना सुरेश दुबे हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी या गुन्ह्यात फरार असलेले जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दिपक ठाकूर, गजानन अनंत पाटील, संजय चैत्या कडू, पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाडेकर यांच्यावर तसेच सध्या मृत असलेले भास्कर ठाकूर आणि नारायण गौडा यांच्या विरुध्द पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले.          २००४ मध्ये याप्रकरणी खूनप्रकरणी, टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अ‍ॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले. आत्तापर्यंत याप्रकरणी सरकारी पक्षाने १०२ साक्षीदार तपासले असून २ हजार ६०० पेक्षा अधिक कागदपत्रे न्यायालयासमोर आली आहेत. याप्रकरणी खटल्यातील विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ सतिश मिश्रा यांनी न्यायालयाला सरकार पक्षाचे पुरावे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. संजय जैन यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून फिर्यादीच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी शनिवारी न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावरील सुनावणी १७ आॅक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, भारतातील हा शेवटचा टाडा खटला असल्याचे अ‍ॅड. मिश्रा यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून