शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सेंद्रीय खत वापरास प्रोत्साहन द्या : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:00 IST

रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे.

ठळक मुद्देखरीप हंगाम व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक प्रलंबित वीज जोडणीसाठी २९ हजार ४२१ कोटी रक्कमेचा अहवाल सादर शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतक-यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश

पुणे: जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन वाढविण्याबरोबरच संबंधितांनी शेतक-यांच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा करावा.त्याचप्रमाणे सेंद्रीय खतांचा वापर करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे,त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद करावी, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी दिल्या.विधान भवन येथे खरीप हंगाम २०१८ आढावा व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते. रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपध्दतीने जिल्ह्यातील ९३२ किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिका-यांनी बैठकीत दिली. त्यावर या सर्व विक्रेत्यांवर अधिका-यांनी लक्ष ठेवून शेतक-यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी,अशा सुचना बापट यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.त्याचप्रमाणे रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. तसेच मागेल त्याला शेततळे या अंतर्गत २०१६ ते २०१८ या कालावधीत एकूण १९८९ शेततळे पूर्ण झालेली आहेत. मात्र,अजूनही ६८ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच पुढील वर्षात अडीच हजार शेततळ्यांचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सन २०१७- १८या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत १२९६ कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी २९ हजार ४२१ कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतक-यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला बापट यांनी दिले.दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या वर्षातील कामे सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करावीत,अशा सुचना देण्यात आल्या. यंदा जलयुक्त शिवार योजनेतील गावांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी त्यात लक्षपूर्वक काम करावे,असे आदेशही बापट यांनी दिले.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटFarmerशेतकरीSaurabh Raoसौरभ राव