शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय खत वापरास प्रोत्साहन द्या : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:00 IST

रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे.

ठळक मुद्देखरीप हंगाम व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक प्रलंबित वीज जोडणीसाठी २९ हजार ४२१ कोटी रक्कमेचा अहवाल सादर शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतक-यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश

पुणे: जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन वाढविण्याबरोबरच संबंधितांनी शेतक-यांच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा करावा.त्याचप्रमाणे सेंद्रीय खतांचा वापर करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे,त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद करावी, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी दिल्या.विधान भवन येथे खरीप हंगाम २०१८ आढावा व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते. रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपध्दतीने जिल्ह्यातील ९३२ किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिका-यांनी बैठकीत दिली. त्यावर या सर्व विक्रेत्यांवर अधिका-यांनी लक्ष ठेवून शेतक-यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी,अशा सुचना बापट यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.त्याचप्रमाणे रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. तसेच मागेल त्याला शेततळे या अंतर्गत २०१६ ते २०१८ या कालावधीत एकूण १९८९ शेततळे पूर्ण झालेली आहेत. मात्र,अजूनही ६८ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच पुढील वर्षात अडीच हजार शेततळ्यांचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सन २०१७- १८या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत १२९६ कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी २९ हजार ४२१ कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतक-यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला बापट यांनी दिले.दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या वर्षातील कामे सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करावीत,अशा सुचना देण्यात आल्या. यंदा जलयुक्त शिवार योजनेतील गावांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी त्यात लक्षपूर्वक काम करावे,असे आदेशही बापट यांनी दिले.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटFarmerशेतकरीSaurabh Raoसौरभ राव