शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कडक उन्हाचा आंबा उत्पादकांना फटका : गावरान हापूसच्या उत्पादनात ६० टक्क्यांनी घट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 19:07 IST

गेल्या एक महिन्यांपासून पडलेला कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील स्थानिक आंबा उत्पादक शेतक-यांना फसला आहे.

पुणे : गेल्या एक महिन्यांपासून पडलेला कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील स्थानिक आंबा उत्पादक शेतक-यांना फसला आहे. यामुळे गावरान हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ६० टक्क्यांनी घटले आहे.  याशिवाय कडक उन्हाचा रायवळ आंब्याच्या उत्पदनावर देखील परिणाम झाला आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजडारामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून गावरान हापूस आंब्याची तुरळक प्रमाणात आवक सुरु झाली आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने मुळशी तालुक्यातील उरावडे, बेलावडे परिसारातून गावरान हापूस आंबा विक्रीसाठी येतो. गावरान हापूस आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जात असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी  असते. परंतु यंदा देवगड, रत्नागिरी आणि कार्नाटक हापूसच्या उत्पादनात तब्बल ५० टक्के घट झाली आहे. तर गावरान हापूसच्या उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे. 

यामुळे सध्या मार्केट मध्ये तुरळक प्रमाणात गावरान हापूसची आवक सुरु झाली आहे.सध्या दरोरड केवळ दहा ते बारा डाग इतकीच आवक सुरु आहे. यामध्ये प्रत्येक डागामध्ये सुमारे १० ते १२ डझन इतके आंबे असतात. गावरान हापूस आंब्याला प्रति डझनास २०० रुपये तर पायरीला १०० रुपये डझनचा भाव मिळत आहे. रायवळ आंबा देखील दाखल होत असून, ३० ते ५० रुपये प्रति डझनाने आंबा विक्रीसाठी बाजारामध्ये आला आहे. याबाबत गावरान हापूसचे व्यापारी तात्या कोंडे यांनी सांगितले की, रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दर वर्षी १५ मेच्या दरम्यान गावरान हापूसची आवक सुरु होते. परंतु यंदा आवक देखील उशीरा सुरु झाली असून, अत्यंत तुरळकर स्वरुपाची आहे. परंतु येत्या रविवार पासून आवक चांगली वाढले असा अंदाज कोंडे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरी