शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:57 IST

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात

पुणे : आज लाखात नव्हे तर कोटींमध्ये चित्रपट निघतात. मात्र, 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे ही निर्मात्यांसाठी कठीण गोष्ट आहे. हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात. जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागे निर्माते उभे राहतात, ही आजची शोकांतिका आहे. आज कलेला ध्येयवादाकडून कुठे घेऊन चाललो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. रामदास फुटाणे यांच्यासारखा एकच माणूस आहे, ज्याने ध्येयवादाचे उद्दिष्ट ठेवून चित्रपटाची निर्मिती केली आहे, असेही कौतुकोद्गार त्यांनी काढले.

राजकारण आणि समाजकारण याचा वास्तववादी चेहरा समोर आणणारा 'सामना' चित्रपट मैलाचा दगड ठरला. सत्तरीच्या दशकातील ‘सामना’ची पन्नाशी. चित्रपटाचे निर्माता, कलाकार यांना प्रत्यक्ष मुलाखतीतून अनुभवण्याची संधी अन् चित्रपटाचे प्रक्षेपण.. असा तिहेरी योग जुळून आल्याने रसिकांची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात तुडुंब गर्दी झाली होती. सभागृहात पाय ठेवायला देखील जागा नव्हती. सभागृहात बसण्यास जागा न मिळाल्याने रसिकांनी जमिनीवर बसून सामना पाहण्याचा आनंद लुटला. एखाद्या सत्तरीच्या दशकातील चित्रपटाला एकविसाव्या शतकातही गर्दी होणे यातून या चित्रपटाचे गारुड रसिक मनावर आजही कायम असल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सामनाचे निर्माते व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विलास रकटे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार, साहित्य कला गौरवचे गौरव फुटाणे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ ‘वाळवी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटासाठी निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ‘कोहिनूर कट्टा’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे, परेश मोकाशी सहभागी झाले होते. या चर्चेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले.

मला राजकारणाचे कोणतेही आकलन नसताना हा चित्रपट काढला होता. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी आत्ता लोक या चित्रपटाला दाद देत आहेत. त्यामुळे 'सामना'चे यश हे तेंडुलकरांचे यश आहे. तेंडुलकर कळणे महत्त्वाचे आहे. ज्यांना तेंडुलकर कळले त्यांनाच चित्रपट काढणे शक्य आहे. आजच्या काळातही मारुती कांबळे लागू होतो. एससी आणि ओबीसी यांना कसे वापरायचे हे राजकारण्यांना कळते. - रामदास फुटाणे

ज्या चित्रपटाचा कंटेंट उत्कृष्ट असतो तो चित्रपट कधीच कालबाह्य होत नाही. तो आजही लागू पडतो.. हा विजय तेंडुलकर याचा चित्रपट आहे. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांचा अभिनय हेच या चित्रपटाचे व्हिज्युअल आहे. - डॉ. मोहन आगाशे

आज ' सामना' चित्रपटासारखीच एवढी गर्दी मराठी चित्रपटांना झाली पाहिजे, त्यासाठी सामनासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. एका निर्मात्याकडून जेव्हा शाबासकीची थाप मिळते तेव्हा चित्रपट करण्याची उभारी मिळते. - मधुगंधा कुलकर्णी

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाartकलाTheatreनाटकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMONEYपैसाPoliticsराजकारण