शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:57 IST

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात

पुणे : आज लाखात नव्हे तर कोटींमध्ये चित्रपट निघतात. मात्र, 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे ही निर्मात्यांसाठी कठीण गोष्ट आहे. हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात. जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागे निर्माते उभे राहतात, ही आजची शोकांतिका आहे. आज कलेला ध्येयवादाकडून कुठे घेऊन चाललो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. रामदास फुटाणे यांच्यासारखा एकच माणूस आहे, ज्याने ध्येयवादाचे उद्दिष्ट ठेवून चित्रपटाची निर्मिती केली आहे, असेही कौतुकोद्गार त्यांनी काढले.

राजकारण आणि समाजकारण याचा वास्तववादी चेहरा समोर आणणारा 'सामना' चित्रपट मैलाचा दगड ठरला. सत्तरीच्या दशकातील ‘सामना’ची पन्नाशी. चित्रपटाचे निर्माता, कलाकार यांना प्रत्यक्ष मुलाखतीतून अनुभवण्याची संधी अन् चित्रपटाचे प्रक्षेपण.. असा तिहेरी योग जुळून आल्याने रसिकांची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात तुडुंब गर्दी झाली होती. सभागृहात पाय ठेवायला देखील जागा नव्हती. सभागृहात बसण्यास जागा न मिळाल्याने रसिकांनी जमिनीवर बसून सामना पाहण्याचा आनंद लुटला. एखाद्या सत्तरीच्या दशकातील चित्रपटाला एकविसाव्या शतकातही गर्दी होणे यातून या चित्रपटाचे गारुड रसिक मनावर आजही कायम असल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सामनाचे निर्माते व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विलास रकटे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार, साहित्य कला गौरवचे गौरव फुटाणे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ ‘वाळवी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटासाठी निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ‘कोहिनूर कट्टा’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे, परेश मोकाशी सहभागी झाले होते. या चर्चेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले.

मला राजकारणाचे कोणतेही आकलन नसताना हा चित्रपट काढला होता. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी आत्ता लोक या चित्रपटाला दाद देत आहेत. त्यामुळे 'सामना'चे यश हे तेंडुलकरांचे यश आहे. तेंडुलकर कळणे महत्त्वाचे आहे. ज्यांना तेंडुलकर कळले त्यांनाच चित्रपट काढणे शक्य आहे. आजच्या काळातही मारुती कांबळे लागू होतो. एससी आणि ओबीसी यांना कसे वापरायचे हे राजकारण्यांना कळते. - रामदास फुटाणे

ज्या चित्रपटाचा कंटेंट उत्कृष्ट असतो तो चित्रपट कधीच कालबाह्य होत नाही. तो आजही लागू पडतो.. हा विजय तेंडुलकर याचा चित्रपट आहे. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांचा अभिनय हेच या चित्रपटाचे व्हिज्युअल आहे. - डॉ. मोहन आगाशे

आज ' सामना' चित्रपटासारखीच एवढी गर्दी मराठी चित्रपटांना झाली पाहिजे, त्यासाठी सामनासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. एका निर्मात्याकडून जेव्हा शाबासकीची थाप मिळते तेव्हा चित्रपट करण्याची उभारी मिळते. - मधुगंधा कुलकर्णी

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाartकलाTheatreनाटकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMONEYपैसाPoliticsराजकारण