शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

बारावीच्या निकालाची कार्यपद्धती राज्य मंडळाकडून निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या निकालाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून प्रत्येक ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या निकालाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी शासन आदेशानुसार तत्काळ कमाल ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करावी. तसेच या समितीच्या माध्यमातून निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना सोमवारी राज्य मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचे सूत्र नुकतेच या राज्य शासनाने प्रसिद्ध केले. या सूत्रानुसार निकाल तयार करण्याचे काम प्रत्येक शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षकांना करावे लागणार आहे. राज्य मंडळातर्फे निकाल तयार करण्याच्या संदर्भातील प्रशिक्षण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाने प्रसिद्ध केले आहे.

कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, वर्ग शिक्षकांनी केलेल्या निकालाला अंतिम स्वरूप कसे द्यावे, या संदर्भातील प्रशिक्षण येत्या ७ ते २३ जुलै दरम्यान दिले जाणार आहे.

निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणती कार्यवाही करावी, या संदर्भातील सविस्तर विश्लेषण राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात आले आहे.

नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आदी विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. इयत्ता दहावीतील, अकरावीतील आणि बारावीच्या कोणत्या परीक्षांच्या गुणांचा समावेश निकाल तयार करण्यासाठी करावा, याबाबत राज्य मंडळाने सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे.