शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आळंदीसह 'या' 10 गावांमध्ये उद्यापासून १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी ; प्रवासी वाहतूक राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 17:12 IST

संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा : आळंदीसह आसपासच्या दहा गावांत उद्यापासून संचारबंदी

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारपासून (दि.६) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डूडूळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक अशा दहा गावांत सोहळा समाप्तीपर्यंत अर्थातच १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.          आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. एकादशी ११ डिसेंबरला तर संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह ८ डिसेंबरला आळंदीत दाखल होतील. 

              तत्पूर्वी ८ डिसेंबरला सकाळी सात वाजता तीस जणांच्या उपस्थितीत गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने कार्तिकी सोहळ्याला प्रारंभ होईल. मंदिरातील कीर्तन, जागर आदी धार्मिक कार्यक्रम पंधरा वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतील. परंपरेप्रमाणे माऊलींसमोर होणाऱ्या सेवांसाठी  संबंधित पाचच व्यक्तींना आमंत्रित केले जाणार आहे. मंदिरातील नित्योपचार पूजा नियमांचे पालन करून संपन्न होणार आहेत. यात्रा कालावधीत आळंदीकडे येणारी खाजगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळेत वारीपूर्वी आणि वारीकाळात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध केला आहे.

आळंदी शहरात तसेच माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिराकडे येणाऱ्यामार्गावर, प्रदक्षिणा रस्ता, शहर प्रवेश करणारे रस्तेही बंद केले जाणार आहेत. पुण्याहून आळंदीकडे येणाऱ्या मॅक्झीन फाटा, डुडुळगाव, चिंबळी फाटा, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता प्रवासास पूर्ण बंद राहणार आहे.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस