शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदींमुळे साखर उद्योगाला सोन्याचे दिवस..." पृथ्वीराज जाचकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:08 IST

राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘एकरकमी एफआरपी’ निर्णयाचे कौतुक केले...

बारामती (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. निश्चितपणे ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, अशा शब्दांत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘एकरकमी एफआरपी’ निर्णयाचे कौतुक केले.

बारामती येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत जाचक बोलत होते. यावेळी जाचक पुढे म्हणाले, मंगळवारी मुंर्बइत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, राजू शेट्टी, आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महाविकास आघाडीने खासगी कारखान्यांसाठी घेतलेल्या पोषक निर्णयांना कात्री लावण्यात आली आहे. मंगळवारी शासनाने मागील हंगामाच्या रिकव्हरीवर त्वरित एफआरपी एका टप्प्यात देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. शासनाने सर्व वजनकाटे ऑनलाईन डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वजनात तूट न येता शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळण्यास मदत होणार असल्याचे जाचक म्हणाले.

मागील शासनाने पूर्वी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले आहे. त्यासाठी ते महामंडळ कार्यान्वित करून काही कार्यप्रणाली करता येईल का, ऊसतोडणीचे व्यवहार रेकॉर्डवर आणता येतील; त्यामुळे काही ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्यांकडून चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, याबाबत चर्चा करण्यात आली. दोन कारखान्यांतील अंतराची मर्यादा २५ कि.मी. करण्यात आली आहे. ही अंतराची मर्यादा हटविल्यास त्यामुळे निकोप स्पर्धा होईल. अंतराची मर्यादा काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले आहे.

माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, ब्राझीलच्या धर्तीवर सहकारी साखर कारखानदारांनी इथेनॉल प्रकल्प उभारावा. भविष्यात जगातील इंधनसाठे संपुष्टात येतील. त्यामुळे इथेनॉलच्या दिशेने जाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळणार आहेत. इथेनॉलचे धोरण राबविल्यावर कारखाने आणि शेतकरी समृद्ध होतील. डिजिटल वजनकाट्यांमुळे काटामारी थांबविण्याचा, शेतकऱ्यांचे पैसे वापरण्याची खासगी कारखानदारी वृत्ती संपुष्टात येणार आहे.

सतीश काकडे म्हणाले, साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर केंद्र सरकारने जाहीर करावा. तसेच, दोन साखर कारखान्यातील २५ कि.मी. अंतराची मर्यादा पूर्ण रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या हातातील १५ कि.मी. मर्यादा हटविण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर २५ कि. मी.ची मर्यादा हटविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपचे लोकसभा प्रमुख अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, स्वाभिमानी संघटनेचे राजेंद्र ढवाण, शिवाजी निंबाळकर, आदी उपस्थित होते.

...तर सोमेश्वर कारखाना बंद पाडणार

सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन यांनी एकरकमी एफआरपी सव्वा महिन्याच्या १५ टक्के व्याजासह द्यावी. १० डिसेंबरपर्यंत ते पैसे वर्ग न झाल्यास नाइलाजास्तव कारखाना बंद पाडण्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे. सोमेश्वर परिसरात शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी पैसे मागण्यास सुरुवात झाली आहे. संचालक मंडळाने यात लक्ष घालावे. शेतकरी कृती समितीकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBaramatiबारामती