शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

"नरेंद्र मोदींमुळे साखर उद्योगाला सोन्याचे दिवस..." पृथ्वीराज जाचकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:08 IST

राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘एकरकमी एफआरपी’ निर्णयाचे कौतुक केले...

बारामती (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. निश्चितपणे ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, अशा शब्दांत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘एकरकमी एफआरपी’ निर्णयाचे कौतुक केले.

बारामती येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत जाचक बोलत होते. यावेळी जाचक पुढे म्हणाले, मंगळवारी मुंर्बइत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, राजू शेट्टी, आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महाविकास आघाडीने खासगी कारखान्यांसाठी घेतलेल्या पोषक निर्णयांना कात्री लावण्यात आली आहे. मंगळवारी शासनाने मागील हंगामाच्या रिकव्हरीवर त्वरित एफआरपी एका टप्प्यात देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. शासनाने सर्व वजनकाटे ऑनलाईन डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वजनात तूट न येता शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळण्यास मदत होणार असल्याचे जाचक म्हणाले.

मागील शासनाने पूर्वी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले आहे. त्यासाठी ते महामंडळ कार्यान्वित करून काही कार्यप्रणाली करता येईल का, ऊसतोडणीचे व्यवहार रेकॉर्डवर आणता येतील; त्यामुळे काही ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्यांकडून चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, याबाबत चर्चा करण्यात आली. दोन कारखान्यांतील अंतराची मर्यादा २५ कि.मी. करण्यात आली आहे. ही अंतराची मर्यादा हटविल्यास त्यामुळे निकोप स्पर्धा होईल. अंतराची मर्यादा काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले आहे.

माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, ब्राझीलच्या धर्तीवर सहकारी साखर कारखानदारांनी इथेनॉल प्रकल्प उभारावा. भविष्यात जगातील इंधनसाठे संपुष्टात येतील. त्यामुळे इथेनॉलच्या दिशेने जाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळणार आहेत. इथेनॉलचे धोरण राबविल्यावर कारखाने आणि शेतकरी समृद्ध होतील. डिजिटल वजनकाट्यांमुळे काटामारी थांबविण्याचा, शेतकऱ्यांचे पैसे वापरण्याची खासगी कारखानदारी वृत्ती संपुष्टात येणार आहे.

सतीश काकडे म्हणाले, साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर केंद्र सरकारने जाहीर करावा. तसेच, दोन साखर कारखान्यातील २५ कि.मी. अंतराची मर्यादा पूर्ण रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या हातातील १५ कि.मी. मर्यादा हटविण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर २५ कि. मी.ची मर्यादा हटविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपचे लोकसभा प्रमुख अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, स्वाभिमानी संघटनेचे राजेंद्र ढवाण, शिवाजी निंबाळकर, आदी उपस्थित होते.

...तर सोमेश्वर कारखाना बंद पाडणार

सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन यांनी एकरकमी एफआरपी सव्वा महिन्याच्या १५ टक्के व्याजासह द्यावी. १० डिसेंबरपर्यंत ते पैसे वर्ग न झाल्यास नाइलाजास्तव कारखाना बंद पाडण्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे. सोमेश्वर परिसरात शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी पैसे मागण्यास सुरुवात झाली आहे. संचालक मंडळाने यात लक्ष घालावे. शेतकरी कृती समितीकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBaramatiबारामती