शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 13:25 IST

समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो.

ठळक मुद्देउल्हास पवार आणि आबा बागूल यांना आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार प्रदान

पुणे : समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. त्या अर्थाने पसायदान आणि संविधानाच्या प्रस्तावनेत समता हे एक सूत्र दिसून येते. सध्या ज्या विचारधारेचे सरकार सत्तेत आलेले आहे, ती विचारधारा संविधानाची चौकट मोडू पाहत आहे, अशी खंत राज्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी, संविधानाच्या सुरक्षेसाठी एकविचार एकध्येयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.माजी नगरसेवक लोकनेते दयाराम राजगुरू यांच्या ७४ व्या जन्मदिनानिमित्त लोकनेते दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि नगरसेवक आबा बागुल यांना थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी काँग्रेसचे महासचिव माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे  होते. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, नगरसेविका चाँद बी नदाफ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर उल्हास ढोले-पाटील, माजी महापौर रजनी त्रिभुवन, पीएमपीचे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे,  नगरसेवक रफीक शेख, अभय छाजेड, अविनाश बागवे, पँथरचे सुखदेव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.थोरात म्हणाले, ‘उल्हासदादा हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून समतेचा विचार मांडला होता. तोच समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. त्या अर्थाने पसायदान आणि संविधानाच्या प्रस्तावनेत समता हे एक सूत्र दिसून येते. सध्याचे सरकार हे अल्पकालीन टिकणा-या विचारधारेवर सत्तेत आले आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून तो विचार संपणार नाही.किशोर गजभिये म्हणाले, ‘सध्या मुलभूत हक्कांनाच सुरूंग लावला जात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत या देशातील दलित, मुस्लीम, अल्पसंख्यांक सुरक्षित नाही, तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही. ज्या दिवशी भारत संपूर्ण हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल, तो दिवस देशासाठी सगळ्यात मोठी आपत्ती असेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवले आहे. तो दिवस दूर नाही, असे वाटण्याजोगे वातावरण सभोवताली निर्माण झाले आहे.’ लता राजगुरू यांनी प्रास्ताविक केले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातBJPभाजपाGovernmentसरकार