शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

मेंढ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळ्याची तयारी, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 12:58 AM

अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.

काटेवाडी - अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.पालखी सोहळा पोहोचल्यावर अनोख्या पद्धतीने धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात येते. पालखी सोहळा रस्त्यानजीक असलेल्या धर्मशाळेत विसावा घेत असे कांलातराने धर्मशाळा मोडकळीस आल्याने ग्रामस्थांनी पालखी सोहळा विसाव्यासाठी गावामध्ये नेण्याचे नियोजन केले. पालखीरथ रस्त्यावर थांबवून रथामधून तुकाराममहाराजांची पालखी ग्रामस्थ खांद्यावरून गावामध्ये दर्शनासाठी घेऊन जातात. धोतराच्या पायघड्या अंथरून पालखी सोहळ्याचे स्वागत करतात. हा अनोखा स्वागत सोहळा पाहण्यासाठी वैष्णव या ठिकाणी हजेरी लावतात. दुपारी परिसरातील मेंढ्यांंचा वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पार पडतो. हा क्षण पाहण्यासाठी आबालवृद्धांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. हा रिंगण सोहळा शनिवारी (दि. १४) आहे.यावेळी पालखी सोहळ्यातील पहिले रथाभोवती मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण पार पडणार आहे.बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळा दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी येथे विसावतो. येथील दर्शनमंडपाचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग, वीज वितरण विभागासह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर व सोहळा पुढील मुक्कामी गेल्यावर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच विद्याधर काटे यांनी दिली.- राज्यात स्वच्छताग्राम म्हणून काटेवाडी गावची ओळख आहे. पालखी सोहळ्यात राज्यातून येणारा लाखो वैष्णवांचा मेळा या गावाची आवर्जून माहिती घेतो.- या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन नियोजन करीत आहेत. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरू आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी दुतर्फा केलेली वृक्षलागवड लक्षवेधी ठरली आहे.- सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, परिसरातील विहिरीतील शुद्धीकरण, पालखी सोहळ्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या