शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

भारत प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य ; आम्हाला कोणाची मध्यस्थी नको  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 20:05 IST

काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे..

ठळक मुद्देलेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर 

पुणे :  पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध १० पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचिराख होतील. पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आला आहे. परंतु, काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे. हा प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य आपल्या देशात असून, याविषयी कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नको, अशा स्पष्ट शब्दांत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी ठणकावले.  कलम ३७० हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणा-या पाकिस्तानकडून आता अणू बॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचे अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला यावं लागेल,असा शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशाराही दिला.भारतीय जनता पक्षाचे सदस्य, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे त्यांचे  ह्यकलम ३७०, काश्मीर आणि आपणह्ण या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक अजय खेडेकर, अमोल बालवडकर, दीपक पोटे, किरण दगडे पाटील, व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अंबरीश दरक, सामजिक कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, विनोद सातव उपस्थित होते. डॉ. शेकटकर यांनी समर्पक दाखले देत अत्यंत विस्ताराने काश्मीर विषय आपल्या व्याख्यानातून मांडला. दुसरे महायुद्ध, पाक व्याप्त काश्मीर, चीनची कटकारस्थाने, भारताची मवाळ भूमिका, फोफावलेला आंतकवाद, आर्थिक, राजकीय, सामाजिक समीकरणे अशा चौफेर संदभार्तून त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत काश्मीर प्रश्नाचे विश्लेषण केले.बापट म्हणाले, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आजची तरुण पिढी फार अलिप्तपणे पाहत आहे याची खंत वाटते. जर या परिस्थितीत बदल झाला नाही तर आंतकवाद आपल्या दारात येईल. याचे गांभीर्य समजवण्यासाठी डॉ. शेकटकर यांनी पुस्तक लिहून हा प्रश्न घरोघरी पोहोचवावा.  

टॅग्स :PuneपुणेDattatray Shekatkarदत्तात्रय शेकटकरJammu Kashmirजम्मू-काश्मीरchinaचीनPakistanपाकिस्तान