शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्य रेषेच्या आर्थिक मर्यादेत २० वर्षात वाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दारिद्र्य रेषेखालील शिधा पत्रिकेसाठी सरकारने निश्चित केलेल्या वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये या मर्यादेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दारिद्र्य रेषेखालील शिधा पत्रिकेसाठी सरकारने निश्चित केलेल्या वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये या मर्यादेत गेल्या २० वर्षात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांसारखे अनेक कष्टकरी या मर्यादेत येत नाहीत. त्यांना राज्य सरकारच्या एकाही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न मर्यादा वार्षिक सव्वा लाख रुपये करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

कोरोना टाळेबंदीत व्यवसाय गमावून बसलेल्या रिक्षा चालकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळावे म्हणून मागणी करताना आप रिक्षा संघटनेच्या लक्षात ही बाब आली. रिक्षा चालकांसह कष्टकरी श्रमिक वर्गातील अनेक कुुटंबे सरकारच्या दारिद्र्य रेषेखालीलच्या व्याख्येत बसत नसल्याने स्वस्त धान्य योजनेसह अनेक सरकारी योजनांसाठी हा वर्ग अपात्र ठरतो. जिल्हा पुरवठा अधिकारी स्मिता मोरे यांच्याकडे पक्षाने यासंदर्भातील निवेदन दिले आहे. आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, डॉ. अभिजित मोरे, गणेश ढमाले, अनुप शर्मा यावेळी उपस्थित होते.

आम आदमी रिक्षा संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत आचार्य यांनी सांगितले की, २० वर्षात महागाई निर्देशांक कितीतरी वाढला. त्या तुलनेत या मर्यादेतही वाढ करायला हवी. संघटनेने एका रिक्षाचालकाच्या कुटुंबाच्या सर्वसाधारण खर्चावरून वर्षाचा अंदाज काढला. अगदी कमी प्रतीचे स्वस्तातील दूध विचारात घेऊनही हा खर्च वर्षाला १ लाख २७ हजार रूपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे.

आचार्य यांनी सांगितले की रिक्षाचालकांना स्वस्त धान्य दुकानातील २ रूपये किलो धान्य देण्यासंदर्भात विचारले असता ही योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठीच असल्याचे स्पष्ट झाले. दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न मर्यादा केंद्र सरकार निश्चित करते. आहे. त्यामुळे आप सर्व खासदारांना याविषयी कळवणार आहे. मर्यादा वाढवल्यास स्वस्त धान्य योजनेत रिक्षाचालकांसह अन्य कष्टकरी वर्गाचाही समावेश होईल.