शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डिजिटल इंडियाच्या युगात '' पोस्ट पेटी '' काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:21 IST

जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.

रांजणगाव सांडस : लहानपणी नातेवाईकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच  पत्राला स्वत:च्या हाताने कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनातील भावना स्वत:च्या हाताने पत्रात उतरवून पाठवलेले उत्तर अजूनही ठळकपणे नजरेसमोर येते. तसचे लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आमंद वार्ता असे सगळेकाही चालायचे ते टपालपेटीमार्फत.. जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.शहरापासून ते ग्रामीण भागातल्या छोट्या छोठ्या खेडे गावे वाड्या वस्त्यांना जोडणारा दुवा म्हणजे भारतीय टपालसेवेची टपाल पेटी '' डिजिटल इंडिया'' च्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावाकडे पोस्टमन पत्र घेऊन आला तर लोकांच्या मनामध्ये संमिश्र भावना दाटून येत असे. गावातला पोस्टमन आपल्या सुख दुःखाच्या बातम्या कळवतो म्हणून त्याच्यावर घरातल्या माणसाइतकाच प्रेम करायचे. तो ही मोबाईलच्या व्हाट्सअप ,फेसबुक यांच्या युगात फक्त एक आठवणींचा कप्पा बनून राहिल्या आहेत. पूर्वी नोकरीचे कॉल लेटर टपालाद्वारे घरपोच मिळत असे ,परंतु अलीकडील काळात ई-मेल ,मोबाईल, फेसबुक ,व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे भारतीय टपाल सेवा गावाकडील भागात पूर्णपणे  बंद झाल्यात जमा झालेले आहे. 

मागील काही वर्षांपर्यंत ग्रामपंचायत सह सर्व सरकारी कार्यालयांतील कागद पत्रे ही पोस्ट मार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कडे पाठविली जायची. परंतु,  अलिकडच्या  काळात इंटरनेट, व्हॉट्स, जीमेल यांच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती त्वरित उपलब्ध झाल्यामुळे टपाल सेवा यांत्रिकीकरणाच्या युगात कमी झाली आहे. त्यामुळे गावांचा विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. .सौ .शारदा श्यामकांत रणपिसे   (माजी आदर्श सरपंच राजन गाव सांडस )

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसdigitalडिजिटल