शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या लोकसंख्येत झाली १० लाखांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 22:00 IST

गेल्या दोन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत तब्बल १० लाखांना वाढ होऊन ती ५० लाखांवर गेली आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल पाषाण, कात्रज तलावाचा वापर शक्य नाही !

पुणे : काही महिन्यांच्या अंतराने पुणे शहराच्या लोकसंख्येत लाखांची भर पडत आहे. गेल्या दोन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत तब्बल १० लाखांना वाढ होऊन ती ५० लाखांवर गेली आहे. पुणे शहराला सध्या मंजुर असलेला वार्षिक कोटा ११.५० अब्ज घनफुटावरुन (टीएमसी) १५.८५ टीएमसी मिळावा यासाठी लोकसंख्येची गणिते वारंवार बदलली जात आहेत. पाण्याची गळती, व्यावसायिक, औद्योगिक पाणी वापर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, हॉटेल्स आणि हॉस्पिटलचा पाणी वापर गृहीत धरुन वाढीव पाणी कोटा देण्याची गरज असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल झाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि महापालिका प्रतिवादी आहेत. त्यात महापालिकेने आपली बाजू मांडताना लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्यक पाण्याची माहिती दिली आहे. या पुर्वी सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. सध्या शहराचा पाणी वापर १३०० ते १४०० एमएलडी दरम्यान आहे. हा पाणी वापर वार्षिक सोळा ते साडेसोळा टीएमसी होतो. महापालिकेने पाणी वापराची गरज अधोरेखित करताना ३५ ते ४० टक्के होत असलेली पाणी गळती, महापालिकेला शहर हद्दीलगतच्या ५ किलोमीटर अंतरातील गावांना करावा लागणारा पाणी पुरवठा, शहरातील वाढलेली लोकसंख्या, समाविष्ट गावे, शाळा-महाविद्यालये, हॉस्पिटल्स, विमानतळ, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, तसेच मोठ्या सोसायट्यांना अग्नीशमनासाठी ठेवावा लागणारा राखीव पाण्याचा कोटा, दहा टक्के तरती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) याचा विचार केल्यास शहराला ११.५० टीएमसी पाणी देणे शक्य नाही. शहराची तहान भागविण्यासाठी दररोज किमान १२३० एलएलडी (वार्षिक १५.८५ टीएमसी) पाणी आवश्यक असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ----------------------

पाषाण, कात्रज तलावाचा वापर शक्य नाही !शहर हद्दी लगत असलेल्या पाषाण आणि कात्रज येथील तलावांची क्षमता ही अत्यंत तोकडी आहे. तसेच, या तलावांमध्ये मैलापाणी सोडले जात असल्याने हे पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीCourtन्यायालय