शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

उदासीनतेमुळे 'शिवभोजन थाळी'त गरीब उपाशीच;राज्य सरकारची योजना 'झुणका-भाकर'च्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:39 IST

केंद्रांना घरघर : पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रेच सुरू; अनेक केंद्रांना टाळे लागले; अनुदान थकले, भ्रष्टाचाराचे आरोप

- आकाश झगडे

पिंपरी : थकलेले अनुदान, न परवडणाऱ्या दरातील पुरवठा, भ्रष्टाचाराचे आरोप, राज्य सरकारचे दुर्लक्ष यामुळे 'शिवभोजन थाळी' योजनेला घरघर लागली आहे. गरीब, गरजू, मजूर, शेतकरी, बेघर, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांना स्वस्त दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली अनेक शिक्भोजन केंद्रांना टाळे लागले असून, लक्ष न दिल्यास उर्वरितही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रेच सुरू असल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २६ जानेवारी २०२० रोजी वाजत गाजत सुरू झालेल्या शिवभोजन थाळी योजनेची महायुती सरकारच्या काळात वाताहत झाली आहे. या योजनेत लाभार्थ्यांना केवळ दहा रुपयांमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक मूद भात, असा आहार मिळण्याची व्यवस्था आहे. यासाठी सरकार शहरी भागातील केंद्रांना चाळीस रुपये तर ग्रामीण भागात पस्तीस रुपये अनुदान देते. गरजू लोक आजही या योजनेतून भूक भागवत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अनेक ठिकाणी तर शिवभोजन केंद्रावर नागरिकांची बरीच गर्दी असते. परंतु ताटांच्या ठरलेल्या संख्येमुळे अनेकदा काही गरजूंना जेवण देणे शक्य होत नाही. तर काही ठिकाणी शिवभोजन थाळीला म्हणावा तसा प्रतिसाद लाभार्थ्यांकडून मिळताना दिसत नाही.

कोविड काळात अनेकांसाठी ही योजना आधार ठरली. बचत गट, छोट्या व्यावसायिकांना यातून रोजगार मिळत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रांमध्ये वर्दळ दिसून आली. लाभार्थी नसल्याने केंद्र बंद होत असल्याचे कारण दिले जात असले तरी शहरात सुरू असणाऱ्या दोन्ही केंद्रांवर लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे. युती सरकारने सुरू केलेली झुणका-भाकर केंद्रे राजकीय उदासीनतेमुळे नामशेष होत गेली, तसे शिवभोजन केंद्रांबाबत होऊ नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.योजनेला घरघर का?अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप इतर योजनांचा तिजोरीवर भार, त्यामुळे निधीमध्ये वाढ नाही.सरकारकडून अनुदान थकीत महागाईच्या काळात अनुदान न परवडणारे, जेवणाची गुणवत्ता कमी अनेक ठिकाणी लाभार्थी कमी होणे महायुती सरकारकडून दुर्लक्षशहरात या दोन ठिकाणी मिळते शिवभोजन थाळीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी राज्य मार्ग परिवहन महामंडळ उपाहारगृह, वल्लभनगर आगार

राजकीय उदासीनता आणि योजना बंद होण्याची चर्चाएका सरकारने आणलेल्या योजना दुसऱ्या सरकारच्या काळात बंद होतात, याची अनेक उदाहरणे आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये कोणताही भरीव आर्थिक निधी दिला गेला नाही. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही योजना गरजू, कष्टकरी जनतेसाठी महत्त्वाची असल्याचे पटवून दिल्याने ती सुरू ठेवण्यात आली.

दुपारी १२ ते १ च्या दरम्यान सहज उपलब्ध होते जेवणपिंपरी-चिंचवडमध्ये नवनगरविकास प्राधिकरण आकुर्डीत शिवभोजन थाळी मिळते. परंतु या भागात लाभार्थ्यांचा प्रतिसाद अधिक असल्याने अनेकदा अतिरिक्त आलेल्या लाभार्थ्यांना जेवण उपलब्ध होऊ शकत नाही. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान गेल्यासच सहज उपलब्ध होतो.

थाळीतील जेवणाची गुणवत्ता सुमारप्रत्यक्षात केंद्रावर जाऊन थाळी खाल्ली असता इतर ठिकाणच्या तुलनेत जेवणाची गुणवत्ता सुमार होती. याबाबत केंद्रचालकाला विचारणा केली असता तुटपुंज्या अनुदानात अशीच थाळी देणे परवडते, असे उत्तर मिळाले. 

मी केंद्रावर येऊन रोज योजनेचा लाभघेत असतो. यामुळे पैशांची बचत होते. माझ्यासारख्या अनेकांचा शिवभोजन थाळी रोजचा आधार आहे. त्यामुळे सरकारने ही योजना सुरू ठेवावी. - रमाकांत जाधव, लाभार्थी 

योजनेचा लाभकेंद्राच्या आसपास असणारे गरीब, कष्टकरी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळे ती बंद केली जाऊ नये. - आकाश सुर्वे, नागरिक

लाडकी बहीण योजनेवर जसे सरकारचे विशेष प्रेम आहे, तसे याही योजनेकडे लक्ष द्यावे. या योजनेस पुनरुज्जीवन देऊन केंद्र वाढवण्यावर भार द्यावा. -  यशराज कुमार, नागरिक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड