शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ; हजाराे गाड्या केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 19:08 IST

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पुण्यातील विश्रांतवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून हजाराे वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पुणे : कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीचे आदेश शहरात लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरासह परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील विनाकारण रस्त्यावर आव्हाने घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी होत नाही. यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तब्बल 1055 वाहने पाेलिसांनी जप्त केली आहेत. तर बाराशे नागरिकांना नाेटीस देखील देण्यात आली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमिवर विश्रांतवाडी पाेलिसांनी केलेली ही कारवाई सर्वात माेठी कारवाई म्हणावी लागेल. विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील साप्रस चौकी, विश्रांतवाडी मुख्य चौक, भरत ढाबा धानोरी, बोपखेल चौक सह विश्रांतवाडी हद्दीतील प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये वेळोवेळी नाकाबंदी करून या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध प्रकारच्या दुचाकीसह बुलेट, ऑटो रिक्षा,  टेम्पो, चार चाकी कार यांच्यासह खाजगी वाहनांचा देखील समावेश आहे. नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात. भाजी खरेदी,  किराणामाल यांच्यासह मेडिकल मधून औषधे घेण्यासाठी जास्त लोक बाहेर पडत आहेत. बहुतांश नागरिक खोटी व चुकीची माहिती देऊन विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस कारवाई करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन बरेच नागरिक रस्त्यावर येत आहेत. विश्रांतवाडी पोलिसांनी सातत्याने केलेल्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये आजाराबद्दल गांभीर्य वाढले असून मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त केल्यामुळे अनावश्यक नागरिक रस्त्यावर येणे बंद झाले आहेत. 

सुरुवातीच्या काळात दोन ते तीन दिवसांनंतर जप्त केलेली वाहने सोडण्यात येत होती. मात्र आजाराचा संसर्ग वाढत असून देखील नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत होते. यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी,  नगरसेवक, आमदार तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख सांगत मध्यस्थाकडून गाड्या सोडवण्यासाठी विनंती वजा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र विश्रांतवाडी पोलिसांनी कोणालाही न जुमानता कारवाया सुरू ठेवत जप्त केलेली वाहने ताब्यातच  ठेवली आहेत. जप्त करण्यात आलेली वाहने  संचारबंदी संपल्यानंतर म्हणजेच तीन मे नंतर मिळणार आहेत असे पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे