शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ; हजाराे गाड्या केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 19:08 IST

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पुण्यातील विश्रांतवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून हजाराे वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पुणे : कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीचे आदेश शहरात लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरासह परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील विनाकारण रस्त्यावर आव्हाने घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी होत नाही. यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तब्बल 1055 वाहने पाेलिसांनी जप्त केली आहेत. तर बाराशे नागरिकांना नाेटीस देखील देण्यात आली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमिवर विश्रांतवाडी पाेलिसांनी केलेली ही कारवाई सर्वात माेठी कारवाई म्हणावी लागेल. विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील साप्रस चौकी, विश्रांतवाडी मुख्य चौक, भरत ढाबा धानोरी, बोपखेल चौक सह विश्रांतवाडी हद्दीतील प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये वेळोवेळी नाकाबंदी करून या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध प्रकारच्या दुचाकीसह बुलेट, ऑटो रिक्षा,  टेम्पो, चार चाकी कार यांच्यासह खाजगी वाहनांचा देखील समावेश आहे. नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात. भाजी खरेदी,  किराणामाल यांच्यासह मेडिकल मधून औषधे घेण्यासाठी जास्त लोक बाहेर पडत आहेत. बहुतांश नागरिक खोटी व चुकीची माहिती देऊन विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस कारवाई करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन बरेच नागरिक रस्त्यावर येत आहेत. विश्रांतवाडी पोलिसांनी सातत्याने केलेल्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये आजाराबद्दल गांभीर्य वाढले असून मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त केल्यामुळे अनावश्यक नागरिक रस्त्यावर येणे बंद झाले आहेत. 

सुरुवातीच्या काळात दोन ते तीन दिवसांनंतर जप्त केलेली वाहने सोडण्यात येत होती. मात्र आजाराचा संसर्ग वाढत असून देखील नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत होते. यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी,  नगरसेवक, आमदार तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख सांगत मध्यस्थाकडून गाड्या सोडवण्यासाठी विनंती वजा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र विश्रांतवाडी पोलिसांनी कोणालाही न जुमानता कारवाया सुरू ठेवत जप्त केलेली वाहने ताब्यातच  ठेवली आहेत. जप्त करण्यात आलेली वाहने  संचारबंदी संपल्यानंतर म्हणजेच तीन मे नंतर मिळणार आहेत असे पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे