शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ड्युटी २४ तास, पण १ तासही पाणी मिळेना ; पोलिसांच्या कुटुंबियांची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 20:43 IST

पोलिसांच्या कुटुंबियांवर तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याची दुर्दवी वेळ आली आहे.

पुणे : समाजाचे प्रश्न मिटविण्यात पोलिसांची भूमिका ही अग्रस्थानी असते. सर्वत्र शांतता रहावी यासाठी पोलीस २४ तास कार्यरत असतात. मात्र याच पोलिसांच्या कुटुंबियांवर तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याची दुर्दवी वेळ आली आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती समाजासाठी २४ तास आॅन ड्युटी असतात. मात्र पुरेसे पाणी मिळावे, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खदखद आंदोलनकर्त्यां महिलांनी व्यक्त केली आहे.

        ऐन नवरात्रोत्सवात पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या  शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या कुटंंबियांनी रास्ता रोको आंदोलन करावे लागले. तसेच येथील रहिवाशांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. पोलिसांच्या कुटुंबियांवर ही वेळ आल्याने घरातील व्यक्ती प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत असल्याची चित्र रविवारी वसाहतीमध्ये पहायला मिळाले. सध्या या ठिकाणी पोलिसांची सुमारे १ हजार कुटुंबिय वास्तव्यास आहेत. येथीस लोकसंख्या अडिच हजारांच्या घरात आहे. वसाहतीला रोज सकाळी ८ ते ९ तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याचा दाब अत्यंत कमी असतो. तर कधी-कधी तर २० मिनिट देखील पाणी सोडले जात नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रहिवाशी या समस्यांचा समाना करीत असून रविवारी त्यांचा संताप उसळला.  

               वसाहतीला पाणी पुरविण्यासाठी १६ लाख लिटरची टाकी उभारण्यात आली आहे. याच टाकीच्या शेजारी खड्डा करून २० लाख लिटरची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात लष्कर आणि एसएनडीटी जल केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. पुर्वी येथे केवळ एकच लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र पाच वर्षांपुर्वी दुसरी लाईन टाकण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणांहून योग्य दबावात पाणी सोडल्यानंतर खाली असलेली टाकी सुमारे ६ तासांत पुर्ण भरते. त्यानंतर हे पाणी वरील टाकीत सोडले जाते व तेथून वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र २० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या टाकीत दररोज १० लाख लिटर पाणी देखील सोडले जात नाही. त्यापुर्वीच पाणी थांबविण्यात येते. त्यामुळे याठिकाणी नेहमीच पाण्याचा तुडवडा भासत आहे, अशी माहिती शेखर शेवाळे यांनी दिली. पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकीजवळच्या केंद्रात तीन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी टाकीत आल्यानंतर त्यांचे पीडब्ल्युडीकडून वितरण केले जाते.             दोन हापश्यांवर भिस्त तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने रविवाश्यांनी परिसरातून पाणी आणून दैनंदिन गरजा भागवल्या. याकाळात इमारत १०४ जवळ आणि हुतात्मा बालवीर शाळेजवळ असलेल्या हापशाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आला. या दोन्ही हापश्यांवर नागरिकांची भिस्त होती. महिलांनी येथून डोक्यावर पाणी वाहून कुटुंबियांची तहाण भागविली. 

मोटार पाच वर्षांपासून बंद खालील टाकीत पाणी साचल्यानंतर दोन मोटारींच्या सहाय्याने उपसा करून पाणी मुख्य टाकीत सोडले जाते. मात्र त्यातील एक मोटार सुमारे तीन वर्षांपासून बंद आहे. त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप ती दुरुस्त किंवा बदलण्यात आलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPoliceपोलिस