शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ड्युटी २४ तास, पण १ तासही पाणी मिळेना ; पोलिसांच्या कुटुंबियांची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 20:43 IST

पोलिसांच्या कुटुंबियांवर तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याची दुर्दवी वेळ आली आहे.

पुणे : समाजाचे प्रश्न मिटविण्यात पोलिसांची भूमिका ही अग्रस्थानी असते. सर्वत्र शांतता रहावी यासाठी पोलीस २४ तास कार्यरत असतात. मात्र याच पोलिसांच्या कुटुंबियांवर तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याची दुर्दवी वेळ आली आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती समाजासाठी २४ तास आॅन ड्युटी असतात. मात्र पुरेसे पाणी मिळावे, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खदखद आंदोलनकर्त्यां महिलांनी व्यक्त केली आहे.

        ऐन नवरात्रोत्सवात पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या  शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या कुटंंबियांनी रास्ता रोको आंदोलन करावे लागले. तसेच येथील रहिवाशांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. पोलिसांच्या कुटुंबियांवर ही वेळ आल्याने घरातील व्यक्ती प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत असल्याची चित्र रविवारी वसाहतीमध्ये पहायला मिळाले. सध्या या ठिकाणी पोलिसांची सुमारे १ हजार कुटुंबिय वास्तव्यास आहेत. येथीस लोकसंख्या अडिच हजारांच्या घरात आहे. वसाहतीला रोज सकाळी ८ ते ९ तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याचा दाब अत्यंत कमी असतो. तर कधी-कधी तर २० मिनिट देखील पाणी सोडले जात नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रहिवाशी या समस्यांचा समाना करीत असून रविवारी त्यांचा संताप उसळला.  

               वसाहतीला पाणी पुरविण्यासाठी १६ लाख लिटरची टाकी उभारण्यात आली आहे. याच टाकीच्या शेजारी खड्डा करून २० लाख लिटरची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात लष्कर आणि एसएनडीटी जल केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. पुर्वी येथे केवळ एकच लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र पाच वर्षांपुर्वी दुसरी लाईन टाकण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणांहून योग्य दबावात पाणी सोडल्यानंतर खाली असलेली टाकी सुमारे ६ तासांत पुर्ण भरते. त्यानंतर हे पाणी वरील टाकीत सोडले जाते व तेथून वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र २० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या टाकीत दररोज १० लाख लिटर पाणी देखील सोडले जात नाही. त्यापुर्वीच पाणी थांबविण्यात येते. त्यामुळे याठिकाणी नेहमीच पाण्याचा तुडवडा भासत आहे, अशी माहिती शेखर शेवाळे यांनी दिली. पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकीजवळच्या केंद्रात तीन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी टाकीत आल्यानंतर त्यांचे पीडब्ल्युडीकडून वितरण केले जाते.             दोन हापश्यांवर भिस्त तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने रविवाश्यांनी परिसरातून पाणी आणून दैनंदिन गरजा भागवल्या. याकाळात इमारत १०४ जवळ आणि हुतात्मा बालवीर शाळेजवळ असलेल्या हापशाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आला. या दोन्ही हापश्यांवर नागरिकांची भिस्त होती. महिलांनी येथून डोक्यावर पाणी वाहून कुटुंबियांची तहाण भागविली. 

मोटार पाच वर्षांपासून बंद खालील टाकीत पाणी साचल्यानंतर दोन मोटारींच्या सहाय्याने उपसा करून पाणी मुख्य टाकीत सोडले जाते. मात्र त्यातील एक मोटार सुमारे तीन वर्षांपासून बंद आहे. त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप ती दुरुस्त किंवा बदलण्यात आलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPoliceपोलिस