शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पीएमआरडीए ची मेट्रो उशिरा धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 20:07 IST

पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र शासनाकडून आत्तापर्यंत सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून सुमारे तेराशे कोटी रुपयांचा निधी मिळावा या उद्देशाने पीएमआरडीए कडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र,त्यास यश मिळत नसल्याने पीएमआरडीएची मेट्रो धावण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्दे पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविला जाणार आहे.पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते येत्या ७ मार्च रोजी स्वत: दिल्ली येथे केंद्रीय समितीशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे

पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र शासनाकडून आत्तापर्यंत सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून सुमारे तेराशे कोटी रुपयांचा निधी मिळावा या उद्देशाने पीएमआरडीए कडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र,त्यास यश मिळत नसल्याने पीएमआरडीएची मेट्रो धावण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.पुणे व पिंपरी चिचवड परिसरातील नागरिकांना सार्वजनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे. पीएमएमआरडीए मेट्रो प्रकल्प पब्लिक प्राव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. मात्र, मेट्रोसाठी केंद्र शासनाकडून सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये मिळविण्यासाठी पीएमआरडीएकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, केंद्राच्या समितीकडून त्यात सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्राकडून दाखविलेल्या त्रुटींचे वेळोवेळी समाधानकारक उत्तरे देवूनही केंद्रीय समितीचे समाधान होत नाही.पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यासाठी येत्या ७ मार्च रोजी स्वत: दिल्ली येथे केंद्रीय समितीशी चर्चा करण्यासाठी जाणार आहेत.त्यामुळे पीएमआरडीएची मेट्रो अजूनही अधांतरीच आहे.किरण गित्ते म्हणाले, दिल्लीसह देशभरात मेंट्रो प्रकल्प कार्यान्वित करताना आलेल्या अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये,याची काळजी केंद्र शासनाकडून घेतली जात आहे. पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविला जाणार आहे.तब्बल आठ वर्षानंतर देशात प्रथमच पीपीपी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प सुरू केला जाणार आहे.त्यामुळे भविष्यात येणा-या सर्व अडचणींचे समाधान करक उत्तरे केंद्राकडून मागितले जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळावा यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच खासगी स्तरातून निधी उभारण्याचा मार्गाचाही विचार केला जात आहे.मेट्रो प्रकल्पासाठी तीन कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत.-----------------देशात 26 मेट्रो प्रकल्प सुरू झाले असून पीपीपी तत्त्वावर मेट्रो प्रकल्प सुरू करणे आव्हानात्मक आहे.मेट्रो भोवती 8 हजार कोटींची संपत्ती उभे राहणे अपेक्षित आहे.त्यामुळे प्रस्तावित मेट्रो स्टेशन परिसरातील जागा व्यावसायिक वापरासाठी दिली जाणार आहे.केंद्र शासनाला बरोबर घेवून मेट्रो प्रकल्प सुरू करणे सर्वांच्या हिताचे असल्याने पीएमआरडीएकडून केंद्राकडे निधीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.- किरण गित्ते,महानगर आयुक्त,पीएमआरडीए 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोPMRDAपीएमआरडीए