शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

ग्रामीण भागात पीएमपीला ब्रेक

By admin | Updated: November 8, 2014 23:26 IST

पुणो व पिंपरी-चिंचवड हद्दीलगतच्या ग्रामीण भागात धावणा:या बस बंद करण्याच्या हालचाली पुणो महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

पुणो : पुणो व पिंपरी-चिंचवड हद्दीलगतच्या ग्रामीण भागात धावणा:या बस बंद करण्याच्या हालचाली पुणो महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजगुरुनगर, आळंदी, शिक्रापूर, लोणी काळभोर, सासवड या भागातील नागरिकांना पीएमपीने प्रवास करता येणार नाही. त्यामुळे पुणो शहरात येण्यासाठी त्यांना आता केवळ एसटी महामंडळावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाचाच भाग म्हणून लांब पल्ल्याचे भाडे मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यात आले आहे. वाढलेल्या भाडय़ामुळे पीएमपीचे प्रवासी एसटी बसकडे वळतील आणि त्यानंतर ग्रामीण भागातील पीएमपी सेवा बंद करता येईल. शहरातील वाहतुकीला प्राधान्य देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे भविष्यात पीएमपी पालिका हद्दीपुरतीच मर्यादित राहू शकते असा दावा पीएमपीतील सूत्रंनी केला.
पीएमपीच्या प्रवासभाडय़ात सरासरी 2क् टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पहिल्या सहा किलोमीटरसाठी ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर भाडेवाढ लागू होईल. त्यानुसार सुमारे 5 ते 25 रुपयांर्पयत भाडेवाढ होवू शकते. शहरातील प्रवाशांचा भाडेवाढीचा फटका बसु नये यादृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील खुप कमी मार्ग सहा किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे आहेत. तसेच इतर मार्गावरही जास्त भाडेवाढीचा बोजा पडणार नाही. दोन्ही पालिका हद्दीमध्ये असलेले काही मार्ग लांब पल्ल्याचे आहेत. त्या मार्गावर काही प्रमाणात जास्त भाडे आकारले जाईल. शहरी प्रवाशांना डोळ्य़ासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रंचे म्हणणो आहे. 
ग्रामीण भागात धावणा:या बसेससाठीच भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचा दावा पीएमपीतर्फे केला जात आहे. दोन्ही पालिका हद्दीबाहेर धावणा:या सुमारे 128 बसेस आहेत. त्यातील अनेक बसेस तोटय़ात चालल्या आहेत. तसेच काही मार्गावरील बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. पीएमपीतील सुत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या संचलनासाठी दोन्ही महापालिकांकडून निधी दिला जातो. त्यानुसार हद्दीत चांगला सेवा देणो अपेक्षित आहे. हद्दीबाहेरील संचलनाचा काही प्रमाणात बोजा पडत आहे. हा बोजा कमी झाल्यास शहरातील बसेसची संख्या वाढू शकते. सध्या ग्रामीण भागात काही मार्गावर धावणा:या बसेसचे भाडे एसटीपेक्षा कमी खुप कमी आहे. त्यामुळे या भागातील प्रवासी एसटीऐवजी पीएमपीला पसंती देतात. भाडेवाढीच्या निर्णयामुळे या बसेसचे भाडे एसटीच्या तिकीट दराच्या जवळपास जाईल. परिणामी पीएमपीचे प्रवासी पुन्हा एसटीकडे 
वळू लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या भागातील बस बंद 
करण्याचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)
 
ग्रामीण भागात धावणा:या बसेस बंद केल्यास त्याचा उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही. एक बस दररोज सुमारे 2क्क् किलोमीटरचा प्रवास करते. याचा विचार केल्यास ग्रामीण भागात जाणा:या बसेसच्या फे:या खुप कमी होतात. काही ठराविक टप्प्यांवरच प्रवाशांचा प्रतिसाद असतो. त्यानंतर बसेस रिकाम्या धावतात. कमी अंतरावरील बसेसच्या फे:या त्यातुलनेने जास्त होतात. त्यामुळे प्रवाशांना सेवा मिळण्याबरोबरच 
 
उत्पन्नही वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणा:या बसेसमध्ये हिंजवडी, राजगुरूनगर, चाकण, शिंदेवाडी, मांजरी या परिसरात दररोज नोकरीनिमित्त जाणा:या आणि त्याठिकाणांहून पुण्यात शिक्षण तसेच रोजगारासाठी येणा:या पासधारक प्रवाशांची संख्या मोठी आहे. हे पास मासिक असल्याने महिन्याच्या पहिल्या काही दिवसातच पीएमपीला कोटय़ावधी रुपयांचे आगाऊ उत्पन्न मिळते. या उत्पन्नातून पीएमपीला दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी एकरकमी पैसे मिळतात. मात्र ग्रामीण भागातील सेवा बंद झाल्यास पीएमपीला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागु शकते.
 
 एसटीचा बोजा नको 
ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्याच्या पीएमपी प्रशासनाच्या हालचाली योग्य असून त्यामुळे शहरातील वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करता येईल. मात्र, असे असले तरी भाडेवाढ हा त्यासाठी योग्य उपाय नाही. याचा फटका इतर प्रवाशांनाही बसणार आहे. त्यामुळे ही भाडेवाढ अनावश्यक व आत्मघातकी असल्याचे पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी सांगितले. ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पीएमपी सेवा तोटय़ात चालली आहे. या भागात एसटीने सेवा द्यायला हवी. एसटीचा बोजा पीएमपीने का घ्यायचा? पीएमपी मुख्यत: शहर वाहतुकीसाठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. तेथील प्रवाशांना एसटीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतील तर ते योग्यच आहेत.