शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:45 IST

पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून येरवडा पालिकेत पण विकासापासून वंचितच

- विशाल दरगुडेचंदननगर :पुणे महानगरपालिकेच्या सीमेत समाविष्ट असलेला येरवडा परिसर हा उपनगरातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. येरवड्याची अमरधाम स्मशानभूमी सुसज्ज सर्व सुविधा पाहिल्या तर मेल्यावर जेवढी काळजी घेतली आहे, तर जीवंतपणे प्रभागातील सर्व सुविधा नक्की असतील, असे वाटते. मात्र, तसे अजिबातच नाही. येथील सुविधा म्हणजे ‘मेल्यावर सुविधा, जीवंतपणी वेदना’ अशीच आहे.

विकासाच्या नावाखाली झगमगणाऱ्या पुणे शहरात, येरवड्यासारखा भाग अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. येरवडा हे पुण्याच्या उपनगरातील पहिले गाव. ब्रिटिश काळापासून या भागाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. बंडगार्डन बंधारा हे प्रसिद्ध धरण महात्मा फुले यांनी बांधले होते आणि त्याच पाण्याचा पुरवठा कॅम्प परिसरात होत होता. पुणे सबअर्बन मंडळातील पहिले उपाध्यक्ष बाबुराव रामभाऊ राजगुरू हे येरवड्याचेच होते.

महापालिकेत समावेश झाल्यानंतर येथील गेनबा मोझे, हंबीरराव मोझे (महापौर), राज साळवे (स्थायी समिती सदस्य) अशा अनेक लोकप्रतिनिधींनी भागाचा चेहरा पालटण्याचा प्रयत्न केला. तरीही येरवड्याच्या अनेक प्रभागांमध्ये विकासाची गाडी आजही अडकलेली आहे. १९७२ मध्ये पानशेत धरण फुटल्यामुळे शहरातील हजारो नागरिकांचे पुनर्वसन येरवड्यात करण्यात आले. त्यामुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली, पण त्यानुसार सुविधा वाढल्या नाहीत. आजच्या घडीला येरवडा परिसरात दोन प्रमुख गावठाण आहेत. येरवडा गावठाण आणि नवी खडकी गावठाण. सध्याच्या मनपा रचनेनुसार प्रभाग क्र. ६ ‘येरवडा–गांधीनगर’ असा प्रभाग तयार झाला आहे. यात गणेशनगर, सुभाषनगर, गाडीतळ, यशवंतनगर, बारातेवस्ती, बालाजीनगर, अशोकनगर, लक्ष्मीनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, जेलप्रेस, कामराजनगर अशा विविध वस्त्यांचा समावेश आहे. या भागातील मतदार हा मराठा, दलित आणि मुस्लीम समाजाचे वर्चस्व आहे. सामाजिक विविधतेतून एकात्मता जपणारा हा भाग आहे; मात्र विकासाच्या बाबतीत सर्व समाज एकसमान त्रास सहन करीत आहेत.

- विकासाचा अभाव आणि शैक्षणिक अधोगती

येरवडा भागात पुणे महानगरपालिकेच्या दहा शाळा आहेत. यात नेताजी, आचार्य अत्रे, दगडू जाधव, वस्ताद साळवे, जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, अनुसया बापू सावंत, उर्दू शाळा, गेनबा मोझे आणि मातोश्री शाळा. तसेच कर्नल यंग शाळाही आहे.पण या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वर्गात बसायला बाक नाहीत, शिक्षकांची कमतरता आहे, स्वच्छता गृह स्वच्छ नाहीत आणि पिण्याच्या पाण्याची स्थितीही बिकट आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलचा उत्साह कमी होत आहे. शैक्षणिक दुर्लक्षामुळे अल्पवयीन गुन्हेगारीत वाढ झाली असून, काही मुलांचा वापर चरस-गांजाच्या व्यवहारांसाठी होत असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येते. परिसरात २४ तास खुले असलेले मद्यविक्री केंद्र या परिस्थितीला आणखी खतपाणी घालत आहेत. 

-  अतिक्रमण व वाहतूककोंडी

येरवड्यातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण हा गंभीर प्रश्न आहे. विशेषतः शीला साळवे भाजी मंडई परिसरात विक्रेते रस्त्यावर बसतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशामक वाहनांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय, अनेक वस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे वाढली असून, रस्त्यांचा रुंदीकरण व नाल्यांचे स्वच्छता काम वर्षानुवर्षे रखडलेले आहे. 

-  आरोग्य सुविधा अपुऱ्या

२००७ साली सुरू झालेले राजीव गांधी रुग्णालय हे १०० खाटांचे असून, खासगी संस्थेकडून चालवले जाते. पण हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. फिजिओथेरपी आणि डायग्नोस्टिक सेंटरसाठी अनावश्यकपणे तीन संस्थांना काम देण्यात आले आहे. सध्या केवळ प्रसूतिगृह, कुटुंब नियोजन आणि साथीच्या आजारांच्या ओपीडीपुरतेच हे रुग्णालय मर्यादित आहे. हे पूर्ण क्षमतेने चालू केले, तर ससून रुग्णालयाचा ताण कमी होऊ शकेल, असा स्थानिकांना ससूनला जायचा ताण कमी होऊ शकतो. 

- अस्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

येरवड्यातील काही भागांमध्ये ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते, असे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे उद्भवणारे आजार भोगावे लागतात.याशिवाय, कचरा वेळेवर उचलला जात नाही. विशेषतः येरवडा गावठाण, कंजारभाट वस्ती, शिवराज चौक आणि लक्ष्मीनगर येथे कचऱ्याचे ढीग साचतात. दुर्गंधी, डास, आणि संसर्गजन्य रोग या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. 

- राजकीय स्थिती

येरवडा परिसरात विविध राजकीय पक्षांचे अस्तित्व असून, गेल्या काही दशकांत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय, एमआयएम आणि अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, भाजपला या भागात विशेष यश मिळालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये येरवड्याच्या मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे संजय भोसले सलग तीन वेळा आणि अविनाश साळवे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आहे. इतिहास आणि परंपरेने समृद्ध असलेला येरवडा आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शाळा, रस्ते, आरोग्य, पाणी, आणि स्वच्छतेच्या मूलभूत गरजांसाठी येथील नागरिक दिवसेंदिवस झगडत आहेत. एकीकडे मृत्यूनंतर विद्युत दाहिनी असलेली आधुनिक स्मशानभूमी, तर दुसरीकडे जिवंत माणसाला मूलभूत सुविधा न मिळणारा परिसर हेच येरवड्याचे वास्तव...

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Elections: Well-Equipped Crematorium in Yerwada, Residents Suffer Living

Web Summary : Yerwada faces civic issues despite its historical significance. Schools lack resources, roads are congested due to encroachments, and healthcare is inadequate. Residents struggle with water contamination and uncollected garbage, highlighting a stark contrast between a modern crematorium and poor living conditions.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024Puneपुणे