शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 23:10 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहे.  तुकाराम मुंढेंनी गेल्या सहा महिन्यात जवळपास नऊशेच्यावर कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहे. त्यातल्या सातशेच्या आसपास बदल्या या दोन दिवसांत केल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच पदावर काम करत असलेल्या चालक वाहक, लिपिक, वरिष्ठ कार्यालय अधीक्षक, मदतनीस, फिटर, क्लिनर, मॅकेनिक, अशा अनेक पदांवरील कर्मचा-यांचा समावेश त्यात आहे.मुंढे यांनी पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार करण्यापासून ते प्रवाशांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यापर्यंत काम केले. पीएमपी बसच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या ठेवण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहिलेल्या अनेक कर्मचा-यांकडून कामकाजात कोणतीही सुधारणा नाही तसेच वाहक, चालकांना स्टार्टर, लाईटमन, रिपेअरिंग यांसारखी इतर कामे देण्यात आली होती, असे दुसरे कारण  बदल्यांमागे देण्यात आले आहे. पीएमपीतील वरिष्ठ अधिका-यांच्या मर्जीनुसार हे कर्मचारी कामकाज करत होते. मुंढे यांनी या बदल्या करुन पीएमपीमध्ये चालत आलेली ही मर्जीशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

विकासात्मक आकृतीबंध आराखडाच तयार नसल्याने अनेक वर्ष पीएमपीएलमध्ये मनमानीपणे कर्मचा-यांचे काम सुरु होते. तसेच या कालावधीत नवीन पीएमपी कर्मचारी भरती देखील सुरु राहिली. त्यामुळे पीएमपीवरचा आर्थिक बोजा वाढत जाऊन तोट्याचे प्रमाण काही कोटींमध्ये वाढले, अशी माहिती पाीएमपीच्या एका वरिष्ठ अधिका-याने ‘लोकमत’ ला दिली.

बदल्या बेकायदेशीरपीएमपीच्या फेर आस्थापना आराखडा तयार करताना प्रशासनाने औद्योगिक कामगार कायदा ९ अ प्रमाणे मान्यताप्राप्त कामगार संघटनेस आगाऊ लेखी सूचना देणे व चर्चा करणे बंधनकारक आहे. ते न करताना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी परस्पर नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्याला इंटक कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात जाऊन स्थगिती घेतली होती. या याचिकेवर ८ डिसेंबरला सुनावणी असताना मंगळवारी कार्यालयीन वेळ संपत असताना सायंकाळी अचानक ६२० कामगारांच्या बदल्या केल्या आहेत. ही बाब न्यायालयाचा अवमान करणारी व कामगारांवर सरसकट अन्याय करणारी आहे, असे पीएमपी कामगार संघाचे सल्लागार गोपाळ तिवारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेtukaram mundheतुकाराम मुंढे