शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray: कृपया याचे फोटो काढू नका, आदित्य ठाकरेंची ती कृती सर्वांनाच भावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 14:16 IST

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

पुणे- राज्यभरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात राज्य सरकार संवेदनहीन असल्याचा आरोप माजी पर्यटन मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर, वडगाव आनंद ता जुन्नर येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांचे कुटुंबीयांचीही गुरूवार (दि 27) रोजी त्यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आदित्य यांची छोटीसी कृती मोठा संदेश देऊन गेली अन् सर्वांना भावली. 

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर हे नेते सोबत होते. 

आदित्य यांनी केदारी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, भाऊबीजेच्यादिवशीच ते घरी आल्याने कुटुंबातील महिला भगिंनींनी त्यांना ओवाळले. यावेळी, आदित्य यांनी ओवाळणी स्वरुपात काही भेट दिला. त्यावेळी उपस्थितांना फोटो न काढण्याची विनंती केली. आदित्य यांचा हा संवेदनशीलपणा पाहून सर्वांनाच मनस्वी समाधान वाटले. आदित्य ठाकरे यांनी, 'कुटुंबीयांना भविष्यात शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मदत केली जाईल. आणखी कुठल्या स्वरूपाची मदत लागल्यास अवश्य केली जाणार आहे' असे सांगितले.  

कृषीमंत्री कुठेही दिसत नाहीत

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्याचे कृषिमंत्री कुठेही दिसत नसल्याचे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा कुठेही पोहोचलेली नाही. तसेच घटनाबाह्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी दिसत नाही. शेतकऱ्यांना अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. हे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मदतीसाठी आमच्या हातात काही नसले तरी विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांसोबत आम्ही असल्याचे ते म्हणाले. आपण सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीAditya Thackreyआदित्य ठाकरेRainपाऊस