शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Aditya Thackeray: कृपया याचे फोटो काढू नका, आदित्य ठाकरेंची ती कृती सर्वांनाच भावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 14:16 IST

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

पुणे- राज्यभरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात राज्य सरकार संवेदनहीन असल्याचा आरोप माजी पर्यटन मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर, वडगाव आनंद ता जुन्नर येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांचे कुटुंबीयांचीही गुरूवार (दि 27) रोजी त्यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आदित्य यांची छोटीसी कृती मोठा संदेश देऊन गेली अन् सर्वांना भावली. 

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर हे नेते सोबत होते. 

आदित्य यांनी केदारी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, भाऊबीजेच्यादिवशीच ते घरी आल्याने कुटुंबातील महिला भगिंनींनी त्यांना ओवाळले. यावेळी, आदित्य यांनी ओवाळणी स्वरुपात काही भेट दिला. त्यावेळी उपस्थितांना फोटो न काढण्याची विनंती केली. आदित्य यांचा हा संवेदनशीलपणा पाहून सर्वांनाच मनस्वी समाधान वाटले. आदित्य ठाकरे यांनी, 'कुटुंबीयांना भविष्यात शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मदत केली जाईल. आणखी कुठल्या स्वरूपाची मदत लागल्यास अवश्य केली जाणार आहे' असे सांगितले.  

कृषीमंत्री कुठेही दिसत नाहीत

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्याचे कृषिमंत्री कुठेही दिसत नसल्याचे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा कुठेही पोहोचलेली नाही. तसेच घटनाबाह्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी दिसत नाही. शेतकऱ्यांना अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. हे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मदतीसाठी आमच्या हातात काही नसले तरी विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांसोबत आम्ही असल्याचे ते म्हणाले. आपण सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीAditya Thackreyआदित्य ठाकरेRainपाऊस