शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

जलयुक्तच्या नवीन गावांचे आराखडे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:27 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.

भोर - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या प्रत्येक गावात शिवारफेरी काढून टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये, ते पाणी जमिनीत मुरावे आणि टंचाई दूर व्हावी, म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे, एकात्मिक पाणलोटक्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, तसेच आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेल्या गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. या गावांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे.लवकरच आराखडे तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी १९ मार्चपर्यंत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करायची आहेत. जलयुक्त शिवार योजनेत २०१५/१६ साठी १२ गावे, २०१६/१७ मध्ये १२ गावे आणि या वर्षी २०१८/१९ मध्ये २० गावांची निवड करण्यात आली आहेत. योजनेच्या माध्यमातून विविध कामे करून गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार अभियानातधावडी, कारी, धामुणशी, आपटी, म्हसर बुद्रुक, करुंगण, माजगाव, लव्हेरी, डेरे, भांड्रावली, कोंडगाव, कुरुंजी, खोपी, देगाव, कुसगाव, टापरेवाडी, चिखलगाव, कोंढरी, आंबाडे, कामथडी, जांभळी, तळजाईनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.कामे २0१९ पर्र्यत पूर्ण करणारसन २०१८/१९ या वर्षासाठी २० गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. या गावांत कृषिवन, छोटे पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण दुरुस्ती, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे, वळण बंधारे, सलग समतल चर, शिवकालीन टाक्या ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पाहणी करून याच महिन्यात अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून त्याला लगेच मंजुरी मिळणार आहे. ती कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करायची असल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी