शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

जलयुक्तच्या नवीन गावांचे आराखडे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:27 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.

भोर - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या प्रत्येक गावात शिवारफेरी काढून टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये, ते पाणी जमिनीत मुरावे आणि टंचाई दूर व्हावी, म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे, एकात्मिक पाणलोटक्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, तसेच आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेल्या गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. या गावांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे.लवकरच आराखडे तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी १९ मार्चपर्यंत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करायची आहेत. जलयुक्त शिवार योजनेत २०१५/१६ साठी १२ गावे, २०१६/१७ मध्ये १२ गावे आणि या वर्षी २०१८/१९ मध्ये २० गावांची निवड करण्यात आली आहेत. योजनेच्या माध्यमातून विविध कामे करून गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार अभियानातधावडी, कारी, धामुणशी, आपटी, म्हसर बुद्रुक, करुंगण, माजगाव, लव्हेरी, डेरे, भांड्रावली, कोंडगाव, कुरुंजी, खोपी, देगाव, कुसगाव, टापरेवाडी, चिखलगाव, कोंढरी, आंबाडे, कामथडी, जांभळी, तळजाईनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.कामे २0१९ पर्र्यत पूर्ण करणारसन २०१८/१९ या वर्षासाठी २० गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. या गावांत कृषिवन, छोटे पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण दुरुस्ती, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे, वळण बंधारे, सलग समतल चर, शिवकालीन टाक्या ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पाहणी करून याच महिन्यात अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून त्याला लगेच मंजुरी मिळणार आहे. ती कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करायची असल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी