शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जलयुक्तच्या नवीन गावांचे आराखडे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:27 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.

भोर - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या प्रत्येक गावात शिवारफेरी काढून टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये, ते पाणी जमिनीत मुरावे आणि टंचाई दूर व्हावी, म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे, एकात्मिक पाणलोटक्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, तसेच आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेल्या गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. या गावांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे.लवकरच आराखडे तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी १९ मार्चपर्यंत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करायची आहेत. जलयुक्त शिवार योजनेत २०१५/१६ साठी १२ गावे, २०१६/१७ मध्ये १२ गावे आणि या वर्षी २०१८/१९ मध्ये २० गावांची निवड करण्यात आली आहेत. योजनेच्या माध्यमातून विविध कामे करून गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार अभियानातधावडी, कारी, धामुणशी, आपटी, म्हसर बुद्रुक, करुंगण, माजगाव, लव्हेरी, डेरे, भांड्रावली, कोंडगाव, कुरुंजी, खोपी, देगाव, कुसगाव, टापरेवाडी, चिखलगाव, कोंढरी, आंबाडे, कामथडी, जांभळी, तळजाईनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.कामे २0१९ पर्र्यत पूर्ण करणारसन २०१८/१९ या वर्षासाठी २० गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. या गावांत कृषिवन, छोटे पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण दुरुस्ती, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे, वळण बंधारे, सलग समतल चर, शिवकालीन टाक्या ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पाहणी करून याच महिन्यात अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून त्याला लगेच मंजुरी मिळणार आहे. ती कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करायची असल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी