शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

नगर रचनाकार भरतीत डावलण्याचे‘प्लॅनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:35 IST

राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

ठळक मुद्देटाऊन प्लॅनिंग पदवीच्या विद्यार्थ्यांचा आरोपयावर्षी पहिल्यांदाच पात्रतेमध्ये अर्बन प्लॅनिंगचा समावेशअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही पदभरतीत स्थान मिळावे,विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत नगर रचना पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे. अभियांत्रिकी व आर्किटेक्टरच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच अधिक संधी मिळावी, हा त्यामागे उद्देश असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. याबाबत पुण्यातील काही विद्यार्थी शुक्रवारी (दि.१६) आयोगाकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या पदासाठी सिव्हील इंजिनिअरींग किंवा सिव्हीव अ‍ॅन्ड रुरल इंजिनिअरींग किंवा अर्बन अ‍ॅन्ड रुरल इंजिनिअरींग किंवा आर्किटेक्टर किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंग या शाखांची पदवी ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तसेच पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यावर सध्या नगर रचना या पदवी अभ्यासक्रमात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आयोगाच्या इतर पदभरती प्रक्रियेमध्ये केवळ कोणत्याही शाखेच्या पदवीबरोबरच अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. आयोगाच्या परीक्षेर्वी पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. हाच निकष नगर रचनाकार पदासाठीही लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या पदासाठी खुप वर्षांनंतर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पुर्वी केवळ अभियांत्रिकी व आर्किटेक्चर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच परीक्षेसाठी ग्राह्य धरले जात होती. यावर्षी पहिल्यांदाच पात्रतेमध्ये अर्बन प्लॅनिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्यांना मोठी संधी आहे. राज्यात केवळ पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ही पदवी आहे. त्यामुळे ही पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी खुप कमी आहेत. तसेच खुप वर्षांनंतर ही भरती होत आहे. ही संधी गेल्यानंतर पुन्हा लवकर संधी मिळणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यांसदर्भात पुण्यातील काही विद्यार्थी आयोगाला मागण्यांचे निवेदन देणार आहेत. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही पदभरतीत स्थान मिळावे, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.----------सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी टाऊन प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांनाच अधिक प्राधान्य मिळायला हवे. पूर्वी या पदवीचे विद्यार्थी मिळत नव्हते. म्हणून अभियांत्रिकी व आर्किटेक्चर ही पात्रता ग्राह्य धरली जात होती. मात्र, आता टाऊन प्लॅनिंगचे पदवीधर आहे. तसेच आॅनलाईन अर्ज भरतानाही केवळ प्लॅनिंग असा उल्लेख असल्याने गोंधळ उडत आहे. राज्यात केवळ टाऊन प्लॅनिंगची पदवी मिळते. त्यामुळे आपण पात्र ठरणार की नाही, याबाबत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.- अपुर्वा गांधी ...टाऊन प्लॅनिंग पदवीधर अभियांत्रिकी व आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये अर्बन प्लॅनिंगचे शास्त्रशुध्द शिक्षण मिळत नाही. टाऊन प्लॅनिंगचे विद्यार्थी चार वर्ष याचेच शिक्षण घेतात. मात्र, पदभरतीत त्यांना डावलले जात आहे. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांनाच अधिक प्राधान्य मिळायला हवे. प्लॅनिंगच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्याची गरज आहे. किंवा ही भरती प्रक्रिया दोन महिने पुढे ढकलल्यास अंतिम वर्षातील विद्यार्थीही पात्र ठरू शकतील.- प्रा. प्रताप रावळ, समन्वयकटाऊन प्लॅनिंग विभाग, सीओईपी

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक