शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नगर रचनाकार भरतीत डावलण्याचे‘प्लॅनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:35 IST

राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

ठळक मुद्देटाऊन प्लॅनिंग पदवीच्या विद्यार्थ्यांचा आरोपयावर्षी पहिल्यांदाच पात्रतेमध्ये अर्बन प्लॅनिंगचा समावेशअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही पदभरतीत स्थान मिळावे,विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत नगर रचना पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे. अभियांत्रिकी व आर्किटेक्टरच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच अधिक संधी मिळावी, हा त्यामागे उद्देश असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. याबाबत पुण्यातील काही विद्यार्थी शुक्रवारी (दि.१६) आयोगाकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या पदासाठी सिव्हील इंजिनिअरींग किंवा सिव्हीव अ‍ॅन्ड रुरल इंजिनिअरींग किंवा अर्बन अ‍ॅन्ड रुरल इंजिनिअरींग किंवा आर्किटेक्टर किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंग या शाखांची पदवी ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तसेच पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यावर सध्या नगर रचना या पदवी अभ्यासक्रमात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आयोगाच्या इतर पदभरती प्रक्रियेमध्ये केवळ कोणत्याही शाखेच्या पदवीबरोबरच अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. आयोगाच्या परीक्षेर्वी पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. हाच निकष नगर रचनाकार पदासाठीही लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या पदासाठी खुप वर्षांनंतर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पुर्वी केवळ अभियांत्रिकी व आर्किटेक्चर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच परीक्षेसाठी ग्राह्य धरले जात होती. यावर्षी पहिल्यांदाच पात्रतेमध्ये अर्बन प्लॅनिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्यांना मोठी संधी आहे. राज्यात केवळ पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ही पदवी आहे. त्यामुळे ही पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी खुप कमी आहेत. तसेच खुप वर्षांनंतर ही भरती होत आहे. ही संधी गेल्यानंतर पुन्हा लवकर संधी मिळणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यांसदर्भात पुण्यातील काही विद्यार्थी आयोगाला मागण्यांचे निवेदन देणार आहेत. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही पदभरतीत स्थान मिळावे, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.----------सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी टाऊन प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांनाच अधिक प्राधान्य मिळायला हवे. पूर्वी या पदवीचे विद्यार्थी मिळत नव्हते. म्हणून अभियांत्रिकी व आर्किटेक्चर ही पात्रता ग्राह्य धरली जात होती. मात्र, आता टाऊन प्लॅनिंगचे पदवीधर आहे. तसेच आॅनलाईन अर्ज भरतानाही केवळ प्लॅनिंग असा उल्लेख असल्याने गोंधळ उडत आहे. राज्यात केवळ टाऊन प्लॅनिंगची पदवी मिळते. त्यामुळे आपण पात्र ठरणार की नाही, याबाबत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.- अपुर्वा गांधी ...टाऊन प्लॅनिंग पदवीधर अभियांत्रिकी व आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये अर्बन प्लॅनिंगचे शास्त्रशुध्द शिक्षण मिळत नाही. टाऊन प्लॅनिंगचे विद्यार्थी चार वर्ष याचेच शिक्षण घेतात. मात्र, पदभरतीत त्यांना डावलले जात आहे. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांनाच अधिक प्राधान्य मिळायला हवे. प्लॅनिंगच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्याची गरज आहे. किंवा ही भरती प्रक्रिया दोन महिने पुढे ढकलल्यास अंतिम वर्षातील विद्यार्थीही पात्र ठरू शकतील.- प्रा. प्रताप रावळ, समन्वयकटाऊन प्लॅनिंग विभाग, सीओईपी

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक