शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे; मनोज जरांगे पाटलांची ठाकरेंना एकत्र येण्याची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:28 IST

आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.  

पुणे मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे अशी जुनी म्हण आजही खरी ठरते, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी लोकांच्या इच्छेसाठी एकत्र यावं, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. वेगळे लढले तर पडतात, त्यामुळे एकदा लोकांच्या इच्छेचा मान राखून एकत्र यावं असं जरांगे यांनी म्हटलं.माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा आणि धनगर समाज वेगळा नसून एकच आहे. आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि पुढेही वेगळे होणार नाही. धनगरांच्या पाठिंब्यावरून जरांगेंनी प्रतिक्रिया देत सांगितले की, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगरांचा विरोध नाही. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. जरांगे यांनी मुंबईतील मोर्चाबाबत माहिती सांगितली ते म्हणाले, आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.  शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे मराठ्यांचा मोर्चा निघेल. हा मोर्चा कुणालाही टार्गेट करण्यासाठी नाही. माझं शरीर किती साथ देईल सांगता येत नाही, पण जाताना शिवनेरीची माती कपाळावर लावूनच जाईनदरम्यान, संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप माझ्याकडे आहे. असले चाळे थांबवा, नाहीतर वेळ वाईट येईल, असा इशारा फडणवीसांना जरांगे यांनी दिला.तत्पूर्वी,मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर नाेंदी असणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येवू लागली. सुरूवातीला ही प्रक्रिया गतिमान हाेती. परंतु, सध्या कासवगती आली आहे. तर दुसरीकडे ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची व्हॅलिडिटी करून मिळत नाही. शैक्षणिक आणि इतर लाभांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजातील तरूणांनी शनिवारी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा दाैऱ्यावर असतानाच शिंगाेली सर्किट हाऊस परिसरात त्यांना राेखले. घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. आश्वासन देण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येक वेळी आश्वासन मिळते अन् नेते निघून गेल्यानंतर पुढे काहीच हाेत नाही, अशा शब्दात राेष व्यक्त केला. तरूण ऐकण्याच्या मनस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी थेट मंत्री सिरसाट यांना फाेन केला. मराठा तरूणांचा हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनाही यात लक्ष घालून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड