शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे; मनोज जरांगे पाटलांची ठाकरेंना एकत्र येण्याची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:28 IST

आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.  

पुणे मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे अशी जुनी म्हण आजही खरी ठरते, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी लोकांच्या इच्छेसाठी एकत्र यावं, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. वेगळे लढले तर पडतात, त्यामुळे एकदा लोकांच्या इच्छेचा मान राखून एकत्र यावं असं जरांगे यांनी म्हटलं.माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा आणि धनगर समाज वेगळा नसून एकच आहे. आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि पुढेही वेगळे होणार नाही. धनगरांच्या पाठिंब्यावरून जरांगेंनी प्रतिक्रिया देत सांगितले की, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगरांचा विरोध नाही. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. जरांगे यांनी मुंबईतील मोर्चाबाबत माहिती सांगितली ते म्हणाले, आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.  शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे मराठ्यांचा मोर्चा निघेल. हा मोर्चा कुणालाही टार्गेट करण्यासाठी नाही. माझं शरीर किती साथ देईल सांगता येत नाही, पण जाताना शिवनेरीची माती कपाळावर लावूनच जाईनदरम्यान, संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप माझ्याकडे आहे. असले चाळे थांबवा, नाहीतर वेळ वाईट येईल, असा इशारा फडणवीसांना जरांगे यांनी दिला.तत्पूर्वी,मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर नाेंदी असणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येवू लागली. सुरूवातीला ही प्रक्रिया गतिमान हाेती. परंतु, सध्या कासवगती आली आहे. तर दुसरीकडे ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची व्हॅलिडिटी करून मिळत नाही. शैक्षणिक आणि इतर लाभांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजातील तरूणांनी शनिवारी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा दाैऱ्यावर असतानाच शिंगाेली सर्किट हाऊस परिसरात त्यांना राेखले. घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. आश्वासन देण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येक वेळी आश्वासन मिळते अन् नेते निघून गेल्यानंतर पुढे काहीच हाेत नाही, अशा शब्दात राेष व्यक्त केला. तरूण ऐकण्याच्या मनस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी थेट मंत्री सिरसाट यांना फाेन केला. मराठा तरूणांचा हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनाही यात लक्ष घालून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड