शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे; मनोज जरांगे पाटलांची ठाकरेंना एकत्र येण्याची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:28 IST

आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.  

पुणे मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे अशी जुनी म्हण आजही खरी ठरते, असं म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी लोकांच्या इच्छेसाठी एकत्र यावं, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. वेगळे लढले तर पडतात, त्यामुळे एकदा लोकांच्या इच्छेचा मान राखून एकत्र यावं असं जरांगे यांनी म्हटलं.माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा आणि धनगर समाज वेगळा नसून एकच आहे. आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि पुढेही वेगळे होणार नाही. धनगरांच्या पाठिंब्यावरून जरांगेंनी प्रतिक्रिया देत सांगितले की, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगरांचा विरोध नाही. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. जरांगे यांनी मुंबईतील मोर्चाबाबत माहिती सांगितली ते म्हणाले, आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.  शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे मराठ्यांचा मोर्चा निघेल. हा मोर्चा कुणालाही टार्गेट करण्यासाठी नाही. माझं शरीर किती साथ देईल सांगता येत नाही, पण जाताना शिवनेरीची माती कपाळावर लावूनच जाईनदरम्यान, संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप माझ्याकडे आहे. असले चाळे थांबवा, नाहीतर वेळ वाईट येईल, असा इशारा फडणवीसांना जरांगे यांनी दिला.तत्पूर्वी,मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर नाेंदी असणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येवू लागली. सुरूवातीला ही प्रक्रिया गतिमान हाेती. परंतु, सध्या कासवगती आली आहे. तर दुसरीकडे ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची व्हॅलिडिटी करून मिळत नाही. शैक्षणिक आणि इतर लाभांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजातील तरूणांनी शनिवारी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा दाैऱ्यावर असतानाच शिंगाेली सर्किट हाऊस परिसरात त्यांना राेखले. घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. आश्वासन देण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येक वेळी आश्वासन मिळते अन् नेते निघून गेल्यानंतर पुढे काहीच हाेत नाही, अशा शब्दात राेष व्यक्त केला. तरूण ऐकण्याच्या मनस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी थेट मंत्री सिरसाट यांना फाेन केला. मराठा तरूणांचा हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनाही यात लक्ष घालून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड