शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणे आटली : पिंपरी चिंचवडमध्ये पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:27 IST

धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने आठवड्यातून एकदा ऐवजी आता दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले असून, पुढील आठवड्यात पाणीकपात वाढविण्यात येणार आहे. 

पिंपरी : धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने आठवड्यातून एकदा ऐवजी आता दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले असून, पुढील आठवड्यात पाणीकपात वाढविण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून जलउपसा केंद्राच्या माध्यमातून पाणी उचलले जाते. त्यानंतर जलउपसा केंद्रातून जलशुद्धीकरण केंद्रात तेथून जलवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पाण्याची पातळी दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून, ५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसाला ४८० एमएलडीऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या होत्या. 

दिवसाआड पाणी

धरणात आजमितीला ३४.०० टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी हा साठा ४४.८० टक्के होता. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी १० टक्के पाणीसाठा कमी झाला असून, तो ५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. एक मार्चपासून आठवड्यातून एकदा पाणीकपात हे नियोजनही फसले होते. त्यातच यंदा पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्णतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार १० टक्के पाणीकपात लागू करावी, या सूचनेचीही अंमलबजावणी उशिराने केली गेली. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आणखी सात-आठ टक्के पाणीकपात वाढवावी लागणार आहे. आता १० टक्क्यांऐवजी १८ टक्के पाणीकपातीची नामुष्की ओढवणार आहे.

महापौर राहूल जाधव म्हणाले, ‘‘पवना धरणातील गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्यांनी पाणी साठा कमी आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. सध्याचा पाणीसाठा हा जूनअखेरीपर्यंत पुरेसा आहे. पावसाळा लांबल्यास गैरसोय होऊ नये, पाण्याचे संकट ओढावू नये, यासाठी पाणीकपात करावी लागणार आहे. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे.’’

विरोधीपक्षनेते दत्त्ता साने म्हणाले, ‘‘पाणी कपात करण्यापेक्षा पाणी गळती आणि पाणी चोरी यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. पाण्याचे वितरण आजही योग्य पद्धतीने होत नाही. प्रशासनाने पाणी पश्नी गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षीत आहे. अद्याप पाणी कपातीविषयी विरोधीपक्षाच्या सदस्यांना कोणतीही माहिती नाही. जनतेवर परिणाम करणारे निर्णय घेताना गटनेत्यांचा विचार घेणे गरजेचे आहे.’’

शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, ‘‘पाणी कपातीविषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गटनेत्यांशी चर्चा केलेली नाही. ती करणे अपेक्षीत आहे. कपातीला विरोध नाही. पाणी नियोजन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. पाणी गळती, पाणी चोरी रोखून चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला चालना देणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य आणि समान वाटप करणे गरजेचे आहे.’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीdroughtदुष्काळ