शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

धरणे आटली : पिंपरी चिंचवडमध्ये पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:27 IST

धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने आठवड्यातून एकदा ऐवजी आता दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले असून, पुढील आठवड्यात पाणीकपात वाढविण्यात येणार आहे. 

पिंपरी : धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने आठवड्यातून एकदा ऐवजी आता दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले असून, पुढील आठवड्यात पाणीकपात वाढविण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून जलउपसा केंद्राच्या माध्यमातून पाणी उचलले जाते. त्यानंतर जलउपसा केंद्रातून जलशुद्धीकरण केंद्रात तेथून जलवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पाण्याची पातळी दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून, ५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसाला ४८० एमएलडीऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या होत्या. 

दिवसाआड पाणी

धरणात आजमितीला ३४.०० टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी हा साठा ४४.८० टक्के होता. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी १० टक्के पाणीसाठा कमी झाला असून, तो ५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. एक मार्चपासून आठवड्यातून एकदा पाणीकपात हे नियोजनही फसले होते. त्यातच यंदा पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्णतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार १० टक्के पाणीकपात लागू करावी, या सूचनेचीही अंमलबजावणी उशिराने केली गेली. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आणखी सात-आठ टक्के पाणीकपात वाढवावी लागणार आहे. आता १० टक्क्यांऐवजी १८ टक्के पाणीकपातीची नामुष्की ओढवणार आहे.

महापौर राहूल जाधव म्हणाले, ‘‘पवना धरणातील गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्यांनी पाणी साठा कमी आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. सध्याचा पाणीसाठा हा जूनअखेरीपर्यंत पुरेसा आहे. पावसाळा लांबल्यास गैरसोय होऊ नये, पाण्याचे संकट ओढावू नये, यासाठी पाणीकपात करावी लागणार आहे. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे.’’

विरोधीपक्षनेते दत्त्ता साने म्हणाले, ‘‘पाणी कपात करण्यापेक्षा पाणी गळती आणि पाणी चोरी यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. पाण्याचे वितरण आजही योग्य पद्धतीने होत नाही. प्रशासनाने पाणी पश्नी गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षीत आहे. अद्याप पाणी कपातीविषयी विरोधीपक्षाच्या सदस्यांना कोणतीही माहिती नाही. जनतेवर परिणाम करणारे निर्णय घेताना गटनेत्यांचा विचार घेणे गरजेचे आहे.’’

शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, ‘‘पाणी कपातीविषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गटनेत्यांशी चर्चा केलेली नाही. ती करणे अपेक्षीत आहे. कपातीला विरोध नाही. पाणी नियोजन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. पाणी गळती, पाणी चोरी रोखून चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला चालना देणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य आणि समान वाटप करणे गरजेचे आहे.’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीdroughtदुष्काळ