शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

फेथाई चक्रीवादळ उद्या दुपारी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 20:54 IST

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्यता आहे.

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिणेतील सर्व राज्यात दिसून येणार असून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.     फेथाई चक्रीवादळ रविवारी सकाळी मच्छलीपट्टणम येथून ५६० किमी तर, चेन्नईपासून ४६० किमी आणि काकीनाडापासून ६०० किमी दूर होते. हे चक्रीवादळ सोमवारी सकाळी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, किनारपट्टीवर धडकताना त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  आंध्र प्रदेशातील गोदावरी, विशाखापट्टणम, कृष्णा, गुंटूर जिल्हा व पाँडेचरीमधील यामान जिल्ह्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

    राज्यात विदर्भातच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. १७ व १८ डिसेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :weatherहवामानAndhra Pradeshआंध्र प्रदेशTamilnaduतामिळनाडू