शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

'राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:03 IST

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपा नेते सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात पुण्यात मंदिरात आरती करुन आंदोलन केले होते.

ठळक मुद्देपवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत.

पुणे - राज्यात भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी भाजपा नेत्यांना काढला. 

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपा नेते सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात पुण्यात मंदिरात आरती करुन आंदोलन केले होते. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. ''करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आाहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे,'' असे म्हणत पवार यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला. 

अन्नदात्याकडे सरकारचे दुर्लक्ष

शेतकरी गेल्या चौदा महिन्यांपासून घरदार सोडून, थंडी, ऊन, पाऊस कशाचाही विचार न करता आंदोलन करत आहेत. राज्यकर्ते संवेदनशील असतील, तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नोंद त्यांनी घ्यायला हवी होती, ही अपेक्षा व्यक्त करून पवार यांनी ‘दुर्दैवाने अन्नदात्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे,’ अशी टीका केली.

त्या यादीत राजू शेट्टींचे नाव

पवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत. शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल, तर त्याबद्दल मला कल्पना नाही, असेही पवार म्हणाले.

विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा गैरवापर

अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील प्रश्नावरही पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. महाराष्ट्रातच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईTempleमंदिरBJPभाजपा