शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

वेतन, विचारांचा तूट घटस्फोटापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:48 IST

केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला.

पुणे : शिक्षण, नोकरी, वेतन तसेच विचारांमध्ये तफावत असल्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचे पटेनासे झाले. त्यामुळे केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला. दोघांचे लग्न जुळविण्यासाठी धावाधाव करणाºयांनाच या घटस्फोटासाठी प्रयत्न करावे लागले.पती विनय (वय २४) व पत्नी सविता (वय २२) (दोघांची नावे बदललेली) या दोघांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झाले होते. दोघांच्याही ओळखीतील एका मध्यस्थाने हे लग्न जुळवून आणले होते. विनय व सविताच्या राहणीमानामध्ये मोठे अंतर होते. सविताने उच्च शिक्षण घेतल्याने तिला चांगली नोकरीही होती. विनयची नोकरी तुटपुंज्या वेतनाची होती. मात्र, त्याची शेती चांगली असल्याने हे लग्न जुळविण्यात आले. सवितानेही लग्नास होकार दिला. तिच्या आईने विरोध करूनही लग्न लावण्यात आले. पण लग्नानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. सुमारे तीन महिनेच दोघे एकत्र राहिले. त्यानंतर सविताने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.यापुढे एकत्र राहणे शक्य नसल्याने दोघांमार्फत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यात आला. प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी समुपदेशक अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे हा दावा समुपदेशनासाठी पाठविला. गुंजाळ यांनी समुपदेशानाद्वारे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या समुपदेशानाच्या बैठकीतच दोघांचे विचार मिळतेजुळते नसल्याने त्यांच्या निदर्शनास आले. ‘दोघांना एकत्र आणणे शक्य वाटत नव्हते. समुपदेशनावेळी मुलीच्या नातेवाईकांनी घटस्फोटासाठी काही रक्कम मिळण्याचा आग्रह धरला होता. पण मुलाने त्यास असमर्थता दर्शविली. अखेर केवळ लग्नात दिलेल्या वस्तू परत घेण्याच्या अटीवर हा दावा निकाली काढून घटस्फोट देण्यात आला,’ असे गुंजाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्न