शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

वेतन, विचारांचा तूट घटस्फोटापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:48 IST

केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला.

पुणे : शिक्षण, नोकरी, वेतन तसेच विचारांमध्ये तफावत असल्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचे पटेनासे झाले. त्यामुळे केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला. दोघांचे लग्न जुळविण्यासाठी धावाधाव करणाºयांनाच या घटस्फोटासाठी प्रयत्न करावे लागले.पती विनय (वय २४) व पत्नी सविता (वय २२) (दोघांची नावे बदललेली) या दोघांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झाले होते. दोघांच्याही ओळखीतील एका मध्यस्थाने हे लग्न जुळवून आणले होते. विनय व सविताच्या राहणीमानामध्ये मोठे अंतर होते. सविताने उच्च शिक्षण घेतल्याने तिला चांगली नोकरीही होती. विनयची नोकरी तुटपुंज्या वेतनाची होती. मात्र, त्याची शेती चांगली असल्याने हे लग्न जुळविण्यात आले. सवितानेही लग्नास होकार दिला. तिच्या आईने विरोध करूनही लग्न लावण्यात आले. पण लग्नानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. सुमारे तीन महिनेच दोघे एकत्र राहिले. त्यानंतर सविताने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.यापुढे एकत्र राहणे शक्य नसल्याने दोघांमार्फत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यात आला. प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी समुपदेशक अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे हा दावा समुपदेशनासाठी पाठविला. गुंजाळ यांनी समुपदेशानाद्वारे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या समुपदेशानाच्या बैठकीतच दोघांचे विचार मिळतेजुळते नसल्याने त्यांच्या निदर्शनास आले. ‘दोघांना एकत्र आणणे शक्य वाटत नव्हते. समुपदेशनावेळी मुलीच्या नातेवाईकांनी घटस्फोटासाठी काही रक्कम मिळण्याचा आग्रह धरला होता. पण मुलाने त्यास असमर्थता दर्शविली. अखेर केवळ लग्नात दिलेल्या वस्तू परत घेण्याच्या अटीवर हा दावा निकाली काढून घटस्फोट देण्यात आला,’ असे गुंजाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्न