शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वेतन, विचारांचा तूट घटस्फोटापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:48 IST

केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला.

पुणे : शिक्षण, नोकरी, वेतन तसेच विचारांमध्ये तफावत असल्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचे पटेनासे झाले. त्यामुळे केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला. दोघांचे लग्न जुळविण्यासाठी धावाधाव करणाºयांनाच या घटस्फोटासाठी प्रयत्न करावे लागले.पती विनय (वय २४) व पत्नी सविता (वय २२) (दोघांची नावे बदललेली) या दोघांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झाले होते. दोघांच्याही ओळखीतील एका मध्यस्थाने हे लग्न जुळवून आणले होते. विनय व सविताच्या राहणीमानामध्ये मोठे अंतर होते. सविताने उच्च शिक्षण घेतल्याने तिला चांगली नोकरीही होती. विनयची नोकरी तुटपुंज्या वेतनाची होती. मात्र, त्याची शेती चांगली असल्याने हे लग्न जुळविण्यात आले. सवितानेही लग्नास होकार दिला. तिच्या आईने विरोध करूनही लग्न लावण्यात आले. पण लग्नानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. सुमारे तीन महिनेच दोघे एकत्र राहिले. त्यानंतर सविताने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.यापुढे एकत्र राहणे शक्य नसल्याने दोघांमार्फत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यात आला. प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी समुपदेशक अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे हा दावा समुपदेशनासाठी पाठविला. गुंजाळ यांनी समुपदेशानाद्वारे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या समुपदेशानाच्या बैठकीतच दोघांचे विचार मिळतेजुळते नसल्याने त्यांच्या निदर्शनास आले. ‘दोघांना एकत्र आणणे शक्य वाटत नव्हते. समुपदेशनावेळी मुलीच्या नातेवाईकांनी घटस्फोटासाठी काही रक्कम मिळण्याचा आग्रह धरला होता. पण मुलाने त्यास असमर्थता दर्शविली. अखेर केवळ लग्नात दिलेल्या वस्तू परत घेण्याच्या अटीवर हा दावा निकाली काढून घटस्फोट देण्यात आला,’ असे गुंजाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्न