शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

’पासपोर्ट’’ सीम्मोलंघनाचे खरे प्रतीक : ज्ञानेश्वर मुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 17:15 IST

आपण जोपर्यत देशाच्या बाहेर पडणार नाही तोपर्यत आपल्यातील संकुचित भावना संपुष्टात येणार नाही.

ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पासपोर्ट योजनेस प्रारंभ देशातील 125 कोटीपैकी केवळ 8 कोटी लोकांकडे पासपोर्टदरवर्षी पासपोर्ट विभागाच्यावतीने 1 कोटी 10 लाख पासपोर्ट वितरीत विद्यार्थ्यांंना आपल्या प्रगतीकरिता पासपोर्टच्या माध्यमातून भरारी घेण्याचा सल्ला

पुणे : जगभरातील व्यावसायिकांनी भारतात येवून कंपन्या स्थापन केल्या आहेत. रोजगार, शिक्षणाच्या विविध संधी परदेशात असून त्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आता भारतीय विद्यार्थी जात आहेत. हे चित्र समाधानकारक आहे. मात्र, गावचा, महाराष्ट्राचा पर्यायाने देशाच्या विकासासाठी सीमा ओलांडण्याची गरज आहे.  त्यासाठी भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडे पासपोर्ट असणे महत्वाचे असून पासपोर्ट सीमोल्लंघनाचे खरे प्रतीक असल्याचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.  नवभारत निर्मिती व संकल्प सिध्दी यांच्या संयुक्त विद्यमाने माती,पंख आणि आकाश या उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पासपोर्ट देण्याच्या योजनेचा शुभारंभ मुळे यांच्या हस्ते पार पडला.  एस पी महाविद्यालयातून या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या रमाबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. एस.के.जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक दीपक पोटे, प्रा. दिलीप सेठ, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मुळे म्हणाले, देशातील 125 कोटीपैकी केवळ 8 कोटी लोकांकडे पासपोर्ट आहे. या आकडेवारीवरुन अद्याप देशात पासपोर्टविषयी व्यापक पध्दतीने काम करण्याची गरज असल्याचे लक्षात येईल. सुरुवातीच्या काळात विदेश सेवेत काम करत असताना स्वत:कडे पासपोर्ट नव्हता. तसेच आईच्या पासपोर्टवर तिची सही म्हणून अंगठा होता. एक निरक्षर महिला केवळ पासपोर्टच्या आधारे दुस-या देशात जाऊ शकते. त्याकरिता पासपोर्ट किती आवश्यक आहे, याची खात्री त्यावेळी झाली. त्यानंतर शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील पासपोर्ट विषयी जनजागृती केली. सध्या दरवर्षी पासपोर्ट विभागाच्यावतीने 1 कोटी 10 लाख पासपोर्ट वितरीत केले जातात. त्यात दररोज 60 हजार पासपोर्टवर कार्यालयाच्या वतीने कार्यवाही केली जाते. आणि तब्बल दोन लाख एसएमएस पासपोर्टच्या वेगवेगळ्या कार्यालयांतून ग्राहकांपर्यत पोहचविले जात आहेत. आपण जोपर्यत देशाच्या बाहेर पडणार नाही तोपर्यत आपल्यातील संकुचित भावना संपुष्टात येणार नाही. सध्याचे संकुचित राजकारण, धर्मकारणाला दिलेली राजकारणाची जोड यामुळे संकुचित विचारांचे डबके तयार झाले असून मुळे यांनी विद्यार्थ्यांंना आपल्या प्रगतीकरिता पासपोर्टच्या माध्यमातून भरारी घेण्याचा सल्ला दिला.  केवळ परदेशी जाण्याकरिता पासपोर्ट असे नव्हे तर त्यानिमित्ताने विविध देशांमधील संस्कृती, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेण्यास मदत होते. ज्ञानाच्या नवीन वाटा शोधण्यास उपयोगी पडणारे महत्वाचे साधन म्हणून पासपोर्टचा उल्लेख करता येईल. बाहेर देशांतील उपयोगी गोष्टी आपल्याकडे येण्याकरिता स्थलांतर महत्वाचे असून त्यासाठी पासपोर्टशिवाय पर्याय नसल्याचे कुलगुरु डॉ.करमळकर यांनी सांगितले.

*पवार   दोन महिने  पासपोर्टच्या प्रतिक्षेत एका अभ्यास दौ-यासाठी इंदिरा गांधींनी शरद पवार यांना परदेशी जाण्यास सांगितले. त्याकरिता यांची विशिष्ट समितीत निवड देखील करण्यात आली होती. परदेशी जाण्यासाठी पवारांना तातडीने पासपोर्टची गरज होती. त्यांनी पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला. परंतु पोलिस पडताळणी करण्याक रिता झालेला विलंब यामुळे पवार यांना तब्बल दोन महिने पासपोर्टची वाट बघावी लागली. जिथे पवार सारख्या नेत्यांना देखील पासपोर्टसाठी वाट पाहवी लागली तिथे सर्वसामान्यांची काय स्थिती असेल? परंतु आता परिस्थितीत बराच फरक पडल्याचे ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpassportपासपोर्टStudentविद्यार्थी