शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १००

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:08 IST

काही रिक्षांच्या मीटरमध्ये अवास्तव वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास रिक्षाचालकांना विचारणा केली जाते, तेव्हा ते टाळाटाळ किंवा दुर्लक्ष करतात

पुणे : प्रवाशांना निश्चित ठिकाणी वेळेवर पोहाेचविण्यासाठी रिक्षाला प्राधान्य दिले जाते; परंतु काही रिक्षाचालक मीटरमधील वायरमध्ये (मीटर टेम्परिंग) खोडसाळपणा करून मीटरचे स्पीड वाढविण्यात येत आहे. त्यामुळे ५० रुपयांच्या प्रवासासाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. शहरातील काही रिक्षांमध्ये चुकीच्या प्रकारे मीटर सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक भाडे भरावे लागते.

नियमांनुसार २५ रुपये प्रतिकिलोमीटर रिक्षा भाडे आकारले जाते; तसेच रिक्षा सिग्नलवर उभी राहिली असताना मीटरमध्ये कोणताही आकडा वाढत नाही; परंतु काही रिक्षांच्या मीटरमध्ये दर वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे. नेहमीच्या प्रवासात ठराविक भाडे मोजावे लागते; मात्र काही रिक्षांच्या मीटरमध्ये अवास्तव वाढ होत असल्याचे लक्षात आले आहे. जेव्हा रिक्षाचालकांना यासंबंधात विचारणा केली जाते, तेव्हा टाळाटाळ, दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या आणि खोडसाळपणा करणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

अशा वेळी प्रवाशांनी हे करावे...

- ऑटोचालकावर कार्यवाही करणे.- ऑटो मीटरवर ऑन दी स्पॉट तपासणी करायला लावणे.- प्रवासादरम्यान मीटरच्या आकडेवारीचे निरीक्षण करणे.- प्रवासाचे अंतर व भाड्याची तुलना करणे.- प्रवाशांच्या पुराव्यासाठी मीटरची छायाचित्र गोळा करणे.

मी दररोज मोशी ते भोसरीदरम्यान प्रवास करते. साधारणपणे ५० रुपये भाडे देते; परंतु मला मंगळवारी मला १२० रुपये द्यावे लागले. रिक्षाचालकाच्या चुकीमुळे मला ७० रुपये जास्तीचे मोजावे लागले. - नेहा वाघ, प्रवासी

प्रवाशांनी जागरूक राहून फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. चुकीच्या मीटरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक सुधारणा आणि कठोर नियम लागू करणं गरजेचं आहे. - स्मिता अहिरे, प्रवासी

ऑटो मीटरमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाई हे आमचे प्राधान्य आहे. नागरिकांनी तक्रारी नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे. मीटरमध्ये घोटाळा आढळत असेल तर त्वरित त्याचा फोटो काढून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर पाठवावे किंवा कॉल करून त्याबद्दलची माहिती द्यावी. - विष्णू घोडे, आरटीओ अधिकारी

कुठल्याही प्रकारच्या मीटर टेम्परिंग किंवा महिलांशी छेडछाड होणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल. तुम्हाला अशा कोणत्याही घटनेचा सामना करावा लागला तर, कृपया ११२ (हेल्पलाइन) किंवा १०९१ (महिला हेल्पलाइन) नंबरवर तक्रार नोंदवा. आमच्यातर्फे त्वरित कार्यवाही केली जाईल. सुरक्षा आणि न्यायासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. - शफिक पटेल, आझाद रिक्षा संघटना

येथे करा तक्रार

रिक्षाचालक, संबंधित कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल तर ११२ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा किंवा रिक्षाचालकांनी महिलांसोबत कुठल्याही प्रकारची गैरवर्तन केलेस १०९१ या क्रमांकावर कॉल करा.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाpassengerप्रवासीfraudधोकेबाजीPoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिला