शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पसायदान विचार साहित्य संमेलनात नदी शुध्दीकरणाचा संकल्प, राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:18 IST

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे

ठळक मुद्देहे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जलशुध्दीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार

पुणे : पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यावेळी लोकसहभागातून नदी शुध्दीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी संस्थानच्या वतीने देहू ते आळंदी लोकसहभागातून जलशुध्दीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणाचा-हास रोखण्यासाठी नदी शुध्दतेला प्राधान्य दिले जाणार आहे. नदीची स्वच्छता, जलपर्णींची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न, निर्माल्याची व्यवस्था आदींवर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांसह वारकरी, स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, एनसीएस पथक आदींना या प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.शुक्रवारी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलानध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उदघाटन होणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडणार आहे. मनोहर जाधव कवीसंमेलमनाच्या अध्यक्षस्थानी असतील.शनिवारी, १४ एप्रिल रोजी डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत, ‘पसायदानाची वैश्विकता’, ‘माझा धर्म आणि पसायदान’ या विषयांवर चर्चासत्र, सर्वधर्म प्रार्थना, एकांकिका, हरिपाठ, औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘मला उमगलेले पसायदान’, ‘माझे राजकारण, माझे अध्यात्म’, ‘संतवाणी’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कौतिकराव ठोलेपाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांना पसायदान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीdehuदेहूMilind Joshiमिलिंद जोशीSadanand Moreसदानंद मोरे