शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पालकांवरही संस्कार गरजेचे : डॉ. भास्कर गिरधारी; पुण्यात रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:32 PM

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देस्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजनकार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगला सप्तसुरांचा कार्यक्रम

पुणे : कुटुंबातील संवादाची जागा आता संघर्षाने घेतली आहे. समाजजीवनातील ही परिस्थिती चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांवर संस्कार होण्याबरोबर पालकांवरही संस्कार होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर गिरधारी यांनी व्यक्त केले.संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले. या वेळी लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुद्रक-प्रकाशक आनंद लाटकर यांच्या उपस्थितीत पत्रकार भवनच्या सभागृहात स्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आनंद लाटकर म्हणाले, ‘संस्कार घडण्याची गरज काल होती, आज आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे संस्कारधन कायम उपयोगी आहे. ‘जगणं एका गुरुजीचं’ हे आत्मकथन वास्तवदर्शी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केलेल्या व्यक्तीचे आहे.’सुरेश कोते म्हणाले, ‘शिक्षणामुळे विद्या मिळते आणि त्यासाठी पैैसा लागतो. व्यवसाय उद्योगातूनही पैैसा मिळतो हे खरे असले तरी संस्कारातून, संस्काराबरोबर जीवनसमृद्धीचा मार्ग मिळतो. 

रंगला सप्तसुरांचा कार्यक्रमकार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका चारुशीला बेलसरे यांनी ‘सप्तसूर रंगले’ या कार्यक्रमात संस्कारधन पुस्तकातील ओव्या, अभंग, श्लोक, स्तोत्रे, भूपाळी आणि संग्रहित गीतरचनांचे गायन केले. 

टॅग्स :Puneपुणे