शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 2:57 AM

विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.

वसई  - विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून रस्ता रु ंदीकरण तसेच विभाजनाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून ८ वर्षांपूर्वी पापडी रस्त्याचे रुंदीकरण करून अर्धवस्थेत सोडून देण्यात आले होते. तेथे आता गाड्यांची पार्किंग केली जात आहे.घडणाºया अपघातात ज्यांचा काहीच संबंध नाही अश्या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता विभागला की अपघाताचे प्रकार थांबतील असा अजब अंदाज पालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची कत्तल आवश्यक आहे का? हा सवाल वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत.दारुड्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तर रस्ता विभाजनानंतर लावण्यात येणाºया डिव्हायडर तोडूनही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वृक्षतोड करण्यापेक्षा वाहनांच्या गतीवर मर्यादा कशी लावता येईल याकडे जास्त भर असणे गरजेचे असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसºया ठिकाणी झाडांचे रोपण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.हा अजिब न्याय...पापडी तलाव परिसरात आॅक्टोबर २०११ भल्यापहाटे विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला रिक्षासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना, रिक्षा तसेच दुचाकी चालकाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्कॉर्पियो चालकाने उडविले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्यात पुन्हा भल्यापहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिंद्रा गाडीच्या चालकाने एका रिक्षाला उडविले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार