शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

पंतसचिवांच्या राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 01:56 IST

भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत.

भोर  - भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा पडला असून, वाड्याच्या भिंतीवर झाडे उगवली आहेत. तर लाकडे मोडून पडझड झाली आहे. काचा, दरवाजा, खिडक्या मोडल्या असून, वाड्याची दुरवस्था होत चालली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वाड्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.पंतसचिवांनी १७४० मध्ये नीरा नदीकाठावर सुमारे ४४ हजार चौरस फुटाचा अप्रतिम लाकडाचा वापर करुन वीटकाम दगडीकाम याचा सुरेख संगम करुन तीनचौकी प्रशस्त राजवाडा बांधला. राजवाड्याची उभारणी इंग्रजांच्या काळात झाल्याने पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीचा उत्तम नमुना आहे. मात्र, १८६८ मध्ये वाडा आगीत जळाला. त्यामुळे १८६९मध्ये पुन्हा श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी दोन लाख रुपये खर्च करुन वाड्याची नव्याने उभारणी केली होती. भोरच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या वाड्याने नुकतीच दीडशे वर्षे पूर्ण केली आहेत.राजवाड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी टपºया उभारल्या असून, विविध पक्षांची तसेच शासकीय कार्यालये आहेत. यामुळे राजवाडा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. राजवाड्याच्या मागील बाजूस पूर्वेकडील आणी उत्तरेकडील लाकडाची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उगवली आहेत. खिडक्या तुटलेल्या असून, काचा फुटलेल्या आहेत. पावसाचे पाणी पडून लाकडांची मोडतोड झाली आहे. यामुळे वाड्याच्या बाहेरील व आतील बाजूची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाड्याचे मूळ रूप कायम ठेवून वाड्याच्या दुरुस्तीची व संवर्धनाची गरज आहे. मात्र, या वास्तूच्या संवर्धनासाठी आबाराजे पंतसचिव यांनी २००६ ते आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार करुन दुरुस्तीचा नकाशा नगरपालिकेकडे देऊन परवानगी मागितली आहे. मात्र, नगरपालिकेने मागील महिन्यात त्यांना पत्र दिले आहे, की आपणास खराब भाग काढून घेण्यासाठी यापूर्वी कळवले आहे. धोकादायक झालेला भाग उतरवून घेण्यास अथवा दुरुस्त करण्यास महाराष्ट्र नगरपालिका कायदा १९६५ मधील कलम १९५ अन्वये परवानगी देण्यात येत आहे.राजवाड्यात वर्षभर विविध प्रकारच्या मालिका, हिंदी व मराठी चित्रपट यांचे शूटिंग सुरु असते. त्यामुळे वारंवार भिंतीवरचे कलर वारंवार बदलले जातात. अनेक लग्नसमारंभही राजवाड्यात होतात याकडे लक्ष देण्याची गरज असून, वाड्याची दुरुस्ती करुन भोरच्या वैभवात भर घालणाºया संस्थानकालीन वाड्याचे जतन करणे गरजेचे आहे.नगरपालिकेला दिलेल्या नकाशाप्रमाणे राजवाड्याची दुरुस्ती आणी डागडुजी करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. त्याच्यासह उत्तरेकडील अतिक्रमणे काढून द्यावीत. त्यानंतर आम्ही वाड्याचे मूळ रूप न बदलता दुरुस्ती करणार आहोत.- आबाराजे पंतसचिवराजवाड्याच्या सर्व बाजूकडील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढून राजवाडा अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केला जाईल. शिवाय पालिकेने दुरुस्तीची परवानगी दिली आहे.- संतोष वारुळे,मुख्याधिकारी भोर न. पा.

टॅग्स :Puneपुणे