शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पंतसचिवांच्या राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 01:56 IST

भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत.

भोर  - भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा पडला असून, वाड्याच्या भिंतीवर झाडे उगवली आहेत. तर लाकडे मोडून पडझड झाली आहे. काचा, दरवाजा, खिडक्या मोडल्या असून, वाड्याची दुरवस्था होत चालली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वाड्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.पंतसचिवांनी १७४० मध्ये नीरा नदीकाठावर सुमारे ४४ हजार चौरस फुटाचा अप्रतिम लाकडाचा वापर करुन वीटकाम दगडीकाम याचा सुरेख संगम करुन तीनचौकी प्रशस्त राजवाडा बांधला. राजवाड्याची उभारणी इंग्रजांच्या काळात झाल्याने पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीचा उत्तम नमुना आहे. मात्र, १८६८ मध्ये वाडा आगीत जळाला. त्यामुळे १८६९मध्ये पुन्हा श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी दोन लाख रुपये खर्च करुन वाड्याची नव्याने उभारणी केली होती. भोरच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या वाड्याने नुकतीच दीडशे वर्षे पूर्ण केली आहेत.राजवाड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी टपºया उभारल्या असून, विविध पक्षांची तसेच शासकीय कार्यालये आहेत. यामुळे राजवाडा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. राजवाड्याच्या मागील बाजूस पूर्वेकडील आणी उत्तरेकडील लाकडाची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उगवली आहेत. खिडक्या तुटलेल्या असून, काचा फुटलेल्या आहेत. पावसाचे पाणी पडून लाकडांची मोडतोड झाली आहे. यामुळे वाड्याच्या बाहेरील व आतील बाजूची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाड्याचे मूळ रूप कायम ठेवून वाड्याच्या दुरुस्तीची व संवर्धनाची गरज आहे. मात्र, या वास्तूच्या संवर्धनासाठी आबाराजे पंतसचिव यांनी २००६ ते आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार करुन दुरुस्तीचा नकाशा नगरपालिकेकडे देऊन परवानगी मागितली आहे. मात्र, नगरपालिकेने मागील महिन्यात त्यांना पत्र दिले आहे, की आपणास खराब भाग काढून घेण्यासाठी यापूर्वी कळवले आहे. धोकादायक झालेला भाग उतरवून घेण्यास अथवा दुरुस्त करण्यास महाराष्ट्र नगरपालिका कायदा १९६५ मधील कलम १९५ अन्वये परवानगी देण्यात येत आहे.राजवाड्यात वर्षभर विविध प्रकारच्या मालिका, हिंदी व मराठी चित्रपट यांचे शूटिंग सुरु असते. त्यामुळे वारंवार भिंतीवरचे कलर वारंवार बदलले जातात. अनेक लग्नसमारंभही राजवाड्यात होतात याकडे लक्ष देण्याची गरज असून, वाड्याची दुरुस्ती करुन भोरच्या वैभवात भर घालणाºया संस्थानकालीन वाड्याचे जतन करणे गरजेचे आहे.नगरपालिकेला दिलेल्या नकाशाप्रमाणे राजवाड्याची दुरुस्ती आणी डागडुजी करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. त्याच्यासह उत्तरेकडील अतिक्रमणे काढून द्यावीत. त्यानंतर आम्ही वाड्याचे मूळ रूप न बदलता दुरुस्ती करणार आहोत.- आबाराजे पंतसचिवराजवाड्याच्या सर्व बाजूकडील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढून राजवाडा अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केला जाईल. शिवाय पालिकेने दुरुस्तीची परवानगी दिली आहे.- संतोष वारुळे,मुख्याधिकारी भोर न. पा.

टॅग्स :Puneपुणे