शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सत्ताधाऱ्यांमुळेच देशात अराजकाची परिस्थिती: बी.जी.कोळसे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 21:24 IST

गुन्हे थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना मारायची नव्हे, तर गुन्ह्याविषयी चर्चा करुन तोडगा काढा..

ठळक मुद्दे‘भय इथले संपत नाही- हैद्राबाद व उन्नाव बलात्कार प्रकरणी न्याय’ या विषयावर व्याख्यान

पुणे : गुन्हे थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना मारायची नव्हे, तर गुन्ह्याविषयी चर्चा करुन तोडगा काढण्यावर भर हवा. व्यक्ती अमानवीय तेव्हाच होतो जेव्हा सामाजिक परिस्थिती अमानवीय होते. समाजाच्या या अवस्थेस मनुवादी पुरुषसत्ताक व्यवस्था कारणीभूत आहे. आज देशातील अराजक परिस्थिती ही सत्ताधारी राजकीय वर्गाने पसरवली आहे,’ असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.अभिव्यक्ती संघटनेतर्फे ‘भय इथले संपत नाही- हैद्राबाद व उन्नाव बलात्कार प्रकरणी न्याय’ या विषयावर भारत इतिहास संशोधक मंडळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळेस माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अलका जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.अलका जोशी म्हणाल्या, ‘देशभरात महिलांविरोधात, अल्पवयीन मुलींविरोधात होणा-या हिंसाचाराने उच्चांक गाठला आहे. बलात्कार आणि हत्यांच्या घटनांनी लोकांमध्ये अस्वस्थता, नैराश्य आणि संताप निर्माण केला आहे. स्त्रियांवरील हिंसा शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक अशा अनेक प्रकारे केली जाते. स्त्री म्हणून दिली जाणारी दुय्यम वागणूक, भेदभाव, सतत नियंत्रण ठेवणे, निर्णय घेऊ न देणे, स्वातंत्र्य नाकारणे ही देखील हिंसाच आहे.’ ‘गेल्या काही वर्षात भांडवली बाजार व्यवस्थेने समाजातील पितृसत्तेला खतपाणी दिले आहे. विविध जाहिरातींमधून अधिक नफा कमावण्यासाठी स्त्री देहाचा बाजार मांडला आहे. आपण पितृसत्तेशी लढा देण्याबद्दल बोलतो, तेव्हा तिचा समूळ नाश भांडवलशाहीच्या नाशाबरोबरच होऊ शकतो. समाजामध्ये स्त्रीला समानतेची वागणूक मिळावी आणि तिचा आत्मसन्मान व स्वायतत्ता जोपासली जाईल असे वातावरण तयार व्हावे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले.पूनम मंगल यांनी सूत्रसंचालन केले. लोकायत संघटनेची सांस्कृतिक आघाडी असलेल्या ‘काफीला’ने कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकायतचे निरज जैन, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMolestationविनयभंग