शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 15:47 IST

मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

पुणे : आषाढी वारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.आणि त्याचे आदेश देखील काढण्यात आला आहे. वारी आणि वारकरी समाजाबाबत आम्हाला आदर व प्रेमच आहे. परंतु, सध्याची कोरोना परिस्थिती देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता त्यात मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

पुण्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

पवार म्हणाले, पायी वारीबाबत निर्णय घेण्याआधी देहू,आळंदीसह इतर मानाच्या प्रमुख पालख्यांच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वारी सोहळ्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्यास सांगितले आहे. यावेळी लोकप्रतिनिधी,प्रशासन यंत्रणा किंवा वारी मार्गावरील ग्रामस्थांनी कोरोना परिस्थितीमुळे पायी वारी सोहळ्याऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बसने वारी सोहळा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच पंढरपूर येथील प्रशासन यंत्रणांनी देखील कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस झालेल्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा वारी सोहळ्याबाबत ताणाताणी सुरु आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असून या परिस्थितीत आषाढी वारीबाबत काही मध्यम मार्ग निघू शकतो यावर विचार सुरु आहे. 

राजगड रोपवेला विरोध करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं 

सिद्धटेक जीर्णोद्धार असो किंवा रायगड रोप वे याकामांना देखील सुरुवातीला विरोध झाला. मात्र कोणताही निर्णय घेताना तो सर्वसमावेशक असावा याचा विचार केलेला असतो. कधीतरी वयोवृद्ध माणसांना देखील शिवाजी महाराजांच्या इतिहास जाणून घेण्याकरिता ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेटी द्याव्या वाटतात.त्यांच्यासाठीच रोपवेचा पर्याय आहे.पण एक लक्षात घेतले पाहिजे, आज जे राजगड रोपवेला विरोध करत आहे किंवा चढून गडांवर जात आहे. कधीतरी ते सुद्धा ६० वर्षांचे होणार आहे. तरीसुद्धा ज्यांचा विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे अजित पवारांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे