शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 22:14 IST

यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे..

पुणे : यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे. मात्र, वारकरी संप्रदायाला राज्य सरकार या परिस्थितीतून नक्की मार्ग काढेल अशी आशा आहे. याच धर्तीवर यंदा पायी वारीला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी आळंदी आणि देहू पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. तर पवारांनी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त यांच्याशी चर्चा करून व कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ३ ते ४ दिवसांत रिपोर्ट देणार असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत ते अंतिम निर्णय घेतील असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. 

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर वारकऱ्यांशी चर्चा केली.पवार म्हणाले, वारकऱ्यांना समजावायचा प्रयत्न केला. पण त्यांनी वारीबाबत वेगळा विचार करा अशी मागणी केली आहे.तसेच ते म्हणतात, ५० लोक जाणार आहोत. पण पालखी पुढे पुढे जात असताना लोक दर्शनाला एकत्र येणारच आहे ना. परंतु,आता नियुक्त समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दाखवणार असून ते वारीबाबत अंतिम भूमिका घेतील. 

यंदा २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून १ जुलैला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.

... सरकार सांगेल ती संख्या ,नियम संप्रदाय पालन करेल : अभय टिळकराज्य सरकारने यंदा पायी वारीची मुभा द्यावी अशी मागणी आळंदी आणि देहू पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. तसेच कोरोना कमी झाला तर ५०० जणांना परवानगी द्यावी. कोरोना कमी झाला नाही तर २०० जणांना द्यावी. अगदीच स्थिती बिघडली तर १०० जणांना परवानगी द्यावी, असे ३ पर्याय सरकार पुढं ठेवले आहेत अशी माहिती अभय टिळक यांनी दिली. तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ती सर्वांशी चर्चा करून अहवाल देणार आहे. मात्र, १४ जूनला मुक्ताई पालखी प्रस्थान यामुळे १० जूनपर्यंत निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या