शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 22:14 IST

यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे..

पुणे : यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे. मात्र, वारकरी संप्रदायाला राज्य सरकार या परिस्थितीतून नक्की मार्ग काढेल अशी आशा आहे. याच धर्तीवर यंदा पायी वारीला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी आळंदी आणि देहू पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. तर पवारांनी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त यांच्याशी चर्चा करून व कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ३ ते ४ दिवसांत रिपोर्ट देणार असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत ते अंतिम निर्णय घेतील असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. 

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर वारकऱ्यांशी चर्चा केली.पवार म्हणाले, वारकऱ्यांना समजावायचा प्रयत्न केला. पण त्यांनी वारीबाबत वेगळा विचार करा अशी मागणी केली आहे.तसेच ते म्हणतात, ५० लोक जाणार आहोत. पण पालखी पुढे पुढे जात असताना लोक दर्शनाला एकत्र येणारच आहे ना. परंतु,आता नियुक्त समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दाखवणार असून ते वारीबाबत अंतिम भूमिका घेतील. 

यंदा २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून १ जुलैला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.

... सरकार सांगेल ती संख्या ,नियम संप्रदाय पालन करेल : अभय टिळकराज्य सरकारने यंदा पायी वारीची मुभा द्यावी अशी मागणी आळंदी आणि देहू पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. तसेच कोरोना कमी झाला तर ५०० जणांना परवानगी द्यावी. कोरोना कमी झाला नाही तर २०० जणांना द्यावी. अगदीच स्थिती बिघडली तर १०० जणांना परवानगी द्यावी, असे ३ पर्याय सरकार पुढं ठेवले आहेत अशी माहिती अभय टिळक यांनी दिली. तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ती सर्वांशी चर्चा करून अहवाल देणार आहे. मात्र, १४ जूनला मुक्ताई पालखी प्रस्थान यामुळे १० जूनपर्यंत निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या